एका युगाचा अंत होतोय! ८ महिन्यात चार भारतीय दिग्गजांचा कसोटीला अलविदा

Pranali Kodre

चेतेश्वर पुजारा निवृत्त

२४ ऑगस्ट २०२५ रोजी भारताचा दिग्गज कसोटीपटू चेतेश्वर पुजाराने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या निवृत्तीने क्रिकेट चाहत्यांना विशेषत: कसोटी चाहत्यांना मोठा धक्का बसला.

Cheteshwar Pujara | Sakal

भरवशाचा फलंदाज

२०१० साली पदार्पण केल्यानंतर जवळपास एक दशक पुजाराने भारतीय कसोटी संघातील तिसऱ्या क्रमांकाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली होती.

Cheteshwar Pujara | Sakal

चौथा दिग्गज

दरम्यान, गेल्या आठ महिन्यात निवृत्ती घेणारा पुजारा भारताचा चौथा दिग्गज खेळाडू ठरला.

Cheteshwar Pujara - Rohit Sharma | Sakal

पुजाराची कसोटी कारकिर्द

पुजाराने त्याच्या कारकि‍र्दीत १०३ कसोटी सामन्यात ७१९५ धावा केल्या, ज्यात १९ शतकांचा आणि ३५ अर्धशतकांचा समावेश आहे.

Cheteshwar Pujara | Sakal

अश्विनची निवृत्ती

याआधी डिसेंबर २०२४ मध्ये भारताचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.

R Ashwin | Sakal

अश्विनची कामगिरी

अश्विनने २८७ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ७६५ विकेट्स घेतल्या, ज्यात त्याच्या १०६ कसोटी सामन्यातील ५३७ विकेट्सचा समावेश आहे.

R Ashwin | Sakal

रोहित - विराटचाही कसोटीला अलविदा

मे २०२५ मध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनीही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

Virat Kohli - Rohit Sharma | Sakal

विराटची कसोटी कामगिरी

विराट कोहलीने कसोटीत १२३ सामन्यांत ३० शतके आणि ३१ अर्धशतकांसह ९२३० धावा केल्या.

Virat Kohli | Sakal

रोहितची कसोटी कामगिरी

रोहित शर्माने कसोटीत ६७ सामन्यांत १२ शतके आणि १८ अर्धशतकांसह ४३०१ धावा केल्या.

Rohit Sharma | Sakal

एका युगाचा अंत होतोय...

दरम्यान, २०१० ते २०२५ दरम्यान कसोटी क्रिकेट गाजवणारे चार भारतीय दिग्गज अचानक ८ महिन्याच्या कालावधीत निवृत्त झाल्याने कसोटीतील एका युगाचा अंत झाल्याच्या भावना क्रिकेट वर्तुळातून व्यक्त होत आहेत.

Cheteshwar Pujara, R Ashwin, Virat Kohli & Rohit Sharma | Sakal

भारताने कितीवेळा जिंकलाय आशिया कप?

Team India | Sakal
येथे क्लिक करा