Pranali Kodre
नाशिक जिल्ह्यातील वावी गावात शिवरायांच्या पूर्वजांची गढी होती; आज तिचे थोडे अवशेष उरले आहेत.
बाबाजी भोसले यांच्याकडे ८ गावांची पाटीलकी होती. त्यांच्या मुलांपैकी मालोजी हे शिवरायांचे आजोबा.
धाकट्या विठोजी भोसलेंना आठ गावे मिळाली. त्यांनी आपल्या आठ मुलांना एकेक गाव दिलं. नागोजी यांना वावी मिळालं आणि वावीत भोसले घराण्याचा पाया रचला गेला.
शिवाजी महाराज सुरत लुटीतून परतताना विश्रामगडावर थांबले आणि वावीतील नातलगांना भेटले, असं वंशज सांगतात.
वावी म्हणजे बारव. यादवकालीन शिलालेख, चक्रधर स्वामींच्या लिखाणात याचा उल्लेख. बारव अजूनही मंदिरासमोर अस्तित्वात आहे.
वावीतील वैजेश्वर महादेव मंदिर हे यादवकालीन असून, पंचमुखी मुखवटा आजही जतन केला जातो. पुरातन मंदिराचा दगडी स्तंभ वारशाची साक्ष देतो.
वावीतील तीन भोसले वाड्यांपैकी एक वाडा अजूनही उभा आहे. उंच बुरूज, भुयार आणि कोरीव दगडी अवशेष इतिहास जपताना दिसतात.
शाहू राजे दुसरे (आबासाहेब) हे वावी घराण्यातून साताऱ्याच्या गादीवर गेले. पण हा गौरवशाली इतिहास अजूनही अंधारात राहिला आहे.
शहाजी राजांकडून मिळालेल्या तलवारी – एक दशावतार कोरलेली, दुसरी सोन्याच्या मूठीची. पण या ऐश्वर्याचा ठावठिकाणा आज नाही.