Pranali Kodre
शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व घडवणाऱ्या जिजाबाई या केवळ आई नव्हत्या, तर त्या विदुषी, कुशल राजकारणी आणि बहुभाषिक नेतृत्त्वकर्त्या होत्या.
जिजाऊंना कानडी, उर्दू, फारशी, हिंदी या भाषांचे उत्तम ज्ञान होते. त्यांच्या भाषिक कौशल्यामुळे राजकारणातही त्यांचा प्रभाव होता.
शहाजीराजांबरोबर बंगळूर आणि दक्षिण भारतात वास्तव्य करताना जिजाऊंनी कानडी भाषा आत्मसात केली.
तेव्हाच्या राजकीय व्यवहारात फारशी आणि उर्दू यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे. जिजाऊंनी या दोन्ही भाषांवर प्रभुत्व मिळवलं.
हिंदी भाषेचे ज्ञान असल्यामुळे विविध प्रांतांतील लोकांशी संवाद साधणं आणि सहकार्य मिळवणं सोपं झालं.
भाषेचे ज्ञान असल्यामुळे जिजाऊंना राजकीय, सामाजिक आणि प्रशासनिक व्यवहार अधिक परिणामकारकपणे हाताळता आले.
जिजाऊ शहाजीराजांच्या राजकीय निर्णयातही सहभागी होत. विविध भाषांतील ज्ञान हे त्यासाठी अत्यंत उपयोगी ठरले.
शिवरायांना त्यांनी केवळ शौर्याचं नव्हे तर संवाद, सहिष्णुता आणि दूरदृष्टीचं शिक्षण दिलं — त्यामागे हेच बहुभाषिकतेचं सामर्थ्य होतं.