दुर्गराज रायगड उभारण्यात शिवरायांना किती खर्च आला होता?

Saisimran Ghashi

रायगड - स्वराज्याची शान

छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड हा किल्ला १६५६ मध्ये जिंकून घेतला आणि स्वराज्याची राजधानी म्हणून त्याची निवड केली.

raigad fort history | esakal

जावळी विजय आणि रायगडाची स्थापना

शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोऱ्यांचा पराभव करून जावळी जिंकली आणि रायरी किल्ल्यावर ताबा मिळवला.

javali war and raigad formation | esakal

रायरीचे रायगड होण्याची प्रक्रिया

शिवरायांनी रायरी किल्ल्याचे नाव बदलून रायगड ठेवले आणि ते भक्कम बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कामे सुरू केली.

rayari raigad history | esakal

रायगडाच्या मजबुतीकरणासाठी मोठा खर्च

कल्याणचा सुभेदार आबाजी सोनदेव यांना रायगडाच्या बांधकामाची जबाबदारी देण्यात आली. पन्नास हजार होन खर्च करून मोठे बांधकाम करण्यात आले.

raigad fort subhedar abaji sondev | esakal

राजधानीसाठी रायगडची निवड

१६६२ मध्ये शिवाजी महाराजांनी कायमस्वरूपी राजधानीसाठी रायगडची निवड केली, परंतु प्रत्यक्ष हलविण्यासाठी १६७० पर्यंत वाट पाहावी लागली.

raigad fort contruction expenditure | esakal

भक्कम तटबंदी आणि जलव्यवस्था

रायगडाच्या सुरक्षिततेसाठी मजबूत तटबंदी उभारण्यात आली आणि पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली.

raigad fort contruction cost | esakal

१६७४ मध्ये रायगडावर राज्याभिषेक

६ जून १६७४ रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक पार पडला आणि स्वराज्याचे अस्तित्व अधिक मजबूत झाले.

shivaji maharaj coronation raigad fort | esakal

संभाजी महाराज आणि रायगड

शिवरायांच्या निधनानंतर १६८९ पर्यंत रायगड छत्रपती संभाजी महाराजांच्या ताब्यात होता. त्यानंतर औरंगजेबाने तो जिंकला.

sambhaji maharaj raigad story | esakal

छत्रपती संभाजीनगर 150 वर्षांपूर्वी कसे होते? 10 ऐतिहासिक दुर्मिळ फोटो, नक्की बघा

Aurangabad vintage images | esakal
येथे क्लिक करा