संतोष कानडे
छत्रपती शिवाजी महाराज एक प्रशासक म्हणून अत्यंत कठोर होते. माणसं ओळखण्याची हातोटी त्यांच्याकडे होती.
डॉक्टर केदार फाळके यांनी त्यांच्या आज्ञापत्र या ग्रंथात शिवरायांच्या पत्रव्यवहारांची सखोल मांडणी आणि विश्लेषण केलं आहे.
नोकर किंवा चाकर निवडताना कसा निवडावा, याबद्दल शिवरायांचं धोरण लेखकांनी पुराव्यानिशी मांडलं आहे.
'नवीन चाकर अथवा सेवकाची सरकारात भरती करताना त्याचे राहण्याचे ठिकाण, भाऊबंद, पहिली चाकरी याबद्दल विचारणा करावी' असं महाराज पत्रामध्ये सांगतात.
'लबाड, परकीयाकडील गुप्तहेर, खुनी, शराबी, बदआमली अशा माणसास सेवेत घेऊ नये' असे आज्ञापत्रात महाराजांनी लिहिले.
परकीयाकडील पाळती सेवेत असू नये, कारण तो, शत्रूस सर्व हकीकत पोहोचवितो, असं महाराज सांगतात.
एवढंच नाही तर, 'कोणी एक चाकर जामिनाविरहित न ठेवावा, कारण त्याने चोरीमारी केली आणि पळून गेला जामीनदारास जबाबदार धरता येते.'
'अशा लोकांची गय न केल्यामुळे राजाचा वचक राहातो, मनुष्य खबरदार होतो व बेलगाम होत नाही' अशा कठोर भाषेत महाराज लिहितात.
हे पत्र पत्र महाराजांनी २७ जून १६६२ रोजी सर्जेराव जेधे यांना लिहिलं होतं. अशी अनेक पत्रं आणि आज्ञापत्रांचा ग्रंथामध्ये अभ्यास केलेला आहे.