Saisimran Ghashi
छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी महाराज यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला.
लहानपणीच आईचे छत्र हरवले, परंतु आजी जिजाबाईंनी त्यांचा सांभाळ करून त्यांना उत्तम संस्कार दिले.
लहान वयातच राजकारण आणि युद्धनीतीचे प्रशिक्षण घेतले, नऊव्या वर्षी शिवाजी महाराजांसोबत आग्रा मोहिमेला गेले.
संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक असलेल्या संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी ‘बुधभूषण’ हा संस्कृत ग्रंथ लिहिला.
त्यांनी ‘समयनय’ आणि ‘धर्मकल्पलता’ या महत्त्वपूर्ण ग्रंथांचीही रचना केली.
१६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक पार पडला आणि त्यांनी गादीवर विराजमान होत नेतृत्व स्वीकारले.
आपल्या कारकिर्दीत त्यांनी तब्बल १२० युद्धे लढली आणि प्रत्येक वेळी विजय मिळवला.
त्यांच्या मुद्रेवर ‘श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते’ असा अभिमानास्पद उल्लेख होता.
आपल्या अद्वितीय पराक्रमाने इतिहासात अजरामर झालेले छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्याचे खरे रक्षणकर्ते होते!