Anushka Tapshalkar
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. आज आपण ७९वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत. देशप्रेमाच्या भावनेत अनेक जण आपल्या मुलांना देशाशी निगडीत नावे देतात. तुम्हालाही अशी नावे हवी असतील तर ही माहिती वाचा.
'शौर्य' म्हणजे धैर्य आणि निडरपणा. हे नाव तुमच्या चिमुकल्याच्या स्वभावात साहस आणि आत्मविश्वासाची छाप उमटवू शकतं.
'भगत' हे नाव महान शहीद भगत सिंह यांची आठवण करून देतं. देशासाठीची निष्ठा, त्याग आणि भक्ती यांचं सुंदर प्रतीक हे नाव आहे.
'वीर' हे नाव धैर्य आणि शौर्याचं जिवंत उदाहरण आहे. तुमच्या लाडक्या बाळाला धाडसी बनवण्याचा हा सुंदर पर्याय आहे, जो स्वातंत्र्य सेनानींच्या अद्वितीय पराक्रमाची आठवण करून देतो.
'प्रताप' म्हणजे गौरव आणि सामर्थ्याचं सुंदर मिश्रण. हे नाव महाराणा प्रतापांच्या शौर्य, संघर्ष आणि प्रतिष्ठेची प्रेरणादायी आठवण करून देतं.
'आजाद' म्हणजे स्वातंत्र्य आणि मुक्तीची ओळख. चंद्रशेखर आजाद यांच्या प्रेरणेने झळकणारं हे नाव तुमच्या लहान राजकुमाराला निष्ठा, धैर्य आणि स्वाभिमानाची सुंदर शिकवण देतं.