सकाळ डिजिटल टीम
काल विशाखापट्टणम येथे दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामना फारच अटीतटीचा झाला.
सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघाने वर्चस्व दाखवले, पण दिल्लीच्या फलंदाजांनी शेवटच्या क्षणी सामना फिरवला व विजय मिळवला.
लखनौ संघाने प्रथम फलंदाजी करताना २१० धावा उभारल्या व दिल्लीसमोर विजयासाठी तगडे लक्ष्य ठेवले.
पण मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीचे आघाडीचे फलंदाज स्वस्तात तंबूत परतले.
दिल्लीचे सुरूवातीचे ५ फलंदाज अवघ्या ६५ धावांवर माघारी परतले. त्यामुळे सामन्यात लखनौ संघ बाजी मारेल असं वाटलं होतं.
पण इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळायला आलेला आशुतोष शर्मा दिल्लीसाठी संकटमोचक ठरला.
त्याने ३१ चेंडूत ६६ धावांची नाबाद खेळी केली आणि दिल्लीला ३ चेंडू राखून सामना जिंकून दिला.
स्फोटक फलंदाज आशुतोष शर्मा भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करतो.
आधी मध्य प्रदेश संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा आशुतोष आता भारतीय रेल्वे संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो.