संतोष कानडे
मुघल घराण्याचा शेवटचा बादशहा बहादूर शाह जफर (दुसरा) होता, त्याच्या पतनाने ३३० वर्षांहून अधिक काळ चाललेल्या मुघल सत्तेचा अधिकृत अंत झाला.
१८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात बंडखोर सैनिकांनी बहादूर शाह जफर याला भारताचा सम्राट घोषित करून या उठावाचे नेतृत्व त्याच्या हाती सोपवले होते.
ब्रिटिश सैन्याने १८५७ चा उठाव मोडून काढल्यानंतर दिल्लीवर पूर्ण ताबा मिळवला, ज्यामुळे जफरने हुमायूँच्या मकबऱ्यात आश्रय घेतला होता.
२० सप्टेंबर १८५७ रोजी ब्रिटिश अधिकारी मेजर विल्यम हॉडसनने बहादूर शाह जफर याला हुमायूँच्या मकबऱ्यातून अटक केली.
मेजर हॉडसनने जफरच्या डोळ्यांसमोर त्यांचे दोन मुले आणि एका नातवाला दिल्लीच्या 'खूनी दरवाजा' येथे गोळ्या झाडून ठार मारले, ज्यामुळे मुघल राजवंशाची थेट वारसा साखळी संपली.
लाल किल्ल्यात जफर याच्यावर देशद्रोहाचा आणि बंडखोरांना मदत केल्याचा बनावट खटला चालवून ब्रिटिशांनी त्याला दोषी ठरवले.
शिक्षा म्हणून ब्रिटिशांनी त्याला भारतातून हद्दपार करून म्यानमारमधील रंगून येथे नजरकैदेत पाठवले.
ऐश्वर्यात जगलेल्या या शेवटच्या सम्राटाला रंगूनमध्ये एका लाकडी खोलीत अत्यंत गरिबी आणि हलाखीच्या परिस्थितीत दिवस काढावे लागले.
वयाच्या ८७ व्या वर्षी, ७ नोव्हेंबर १८६२ रोजी रंगूनमध्ये एकांत आणि आजारपणामुळे बहादूर शाह जफरचा अत्यंत करुण अंत झाला.
मुघलांच्या नावाने भविष्यात कोणताही विद्रोह किंवा आंदोलन होऊ नये म्हणून ब्रिटिशांनी त्यांच्या मृतदेहाला लष्करी छावणीजवळ गुप्तपणे दफन करून ती जागा गवताने सपाट केली होती.
snake
esakal