मुघल साम्राज्याच्या पतनाची 10 प्रमुख कारणं कोणती?

संतोष कानडे

औरंगजेब

औरंगजेबाच्या प्रदीर्घ युद्धांमुळे मुघल साम्राज्याची आर्थिक आणि लष्करी शक्ती मोठ्या प्रमाणात खर्ची पडली.

अकार्यक्षम उत्तराधिकारी

औरंगजेबाच्या मृत्यूनंतर कमकुवत आणि अकार्यक्षम उत्तराधिकारी सत्तेवर आले, त्यामुळे केंद्राची पकड सैल झाली.

सत्तासंघर्ष

मुघल दरबारातील सत्तासंघर्ष आणि सरदारांमधील गटबाजी वाढत गेली.

महसूल

जाहागीरदारी व्यवस्थेतील संकटामुळे महसूल आणि प्रशासनावर मोठा ताण निर्माण झाला.

केंद्रीय प्रशासन

प्रचंड साम्राज्याचा कारभार सांभाळताना केंद्रीय प्रशासन कमकुवत होत गेले.

मराठे

मराठे, शीख, जाट, राजपूत आणि इतर प्रादेशिक शक्तींनी मुघल सत्तेला मोठे आव्हान दिले.

स्वायत्त सत्ताकेंद्रे

बंगाल, अवध आणि हैदराबादसारख्या प्रांतांमध्ये स्वायत्त सत्ताकेंद्रे मजबूत झाली.

नादिरशाह

नादिरशाहच्या १७३९ मधील आक्रमणामुळे मुघल साम्राज्याची आर्थिक आणि राजकीय कमजोरी स्पष्ट झाली.

अब्दाली

अहमदशाह अब्दालीच्या वारंवार झालेल्या आक्रमणांनी उत्तर भारतातील मुघल सत्तेला आणखी धक्का दिला.

लष्करी प्रभाव

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या वाढत्या राजकीय आणि लष्करी प्रभावामुळे मुघल बादशहांची सत्ता अखेर नाममात्र राहिली आणि १८५७ नंतर मुघल सत्तेचा औपचारिक अंत झाला.

मराठ्यांनी मुघल साम्राज्याचा पाया कसा हादरवला?

mughal

|

esakal

<strong>येथे क्लिक करा</strong>