Sandeep Shirguppe
जयसिंगपूर (ता.शिरोळ,जि.कोल्हापूर) येथील सौ.धनश्री वर्धमान खुरपे यांनी गारवा पदार्थ निर्मितीमध्ये निपुणता मिळवत वेगळेपण जपले आहे.
गारव्याच्या पदार्थांबरोबर, दिवाळी पदार्थ बनवून कायमस्वरूपी ग्राहक आणि आर्थिक स्थिरता मिळवली.
ग्रामीण भागात गारवा देण्याला खूप महत्त्व आहे. हीच गरज ओळखून धनश्रीताईंनी गारवा पदार्थ निर्मितीला व्यावसायिक स्वरूप दिले.
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील अनेक गावांमधून गारव्यासाठीच्या पदार्थांना मोठी मागणी असते. यामध्ये धनश्रताईंनी चांगलाच हातखंडा मिळवला.
सणसमारंभासाठी लागणारे पदार्थ आणि गारव्यासाठी मित्र मंडळींना त्यांचे नाव सुचवतात, त्यातूनही त्यांना व्यवसाय वृद्घीसाठी चांगली मदत झाली आहे.
मोठी मुलगी पायल हिने फूड टेक्नॉलॉजीमध्ये बी.टेक केले आहे. आर्या ही कृषी शिक्षण घेत आहे. दोन्ही मुली गरजेनुसार धनश्रीताईंना पदार्थ निर्मितीत मदत करतात.
धनश्रीताईंच्या मैत्रिणी आणि नातेवाईकांचे व्हॉटसअप ग्रुप आहेत. यामध्ये त्या दररोज तयार होणाऱ्या पदार्थांची माहिती देतात.
गारव्याचा हंगाम वर्षभर सुरू असतो. या कालावधीत आठवड्यातून एक ते दोन गारव्यासाठी मागणी असते. याशिवाय दिवाळीसाठी लागणारे विविध फराळाचे पदार्थ करतात.
गारव्यामध्ये विशेष करुन भाकरी, झुणका, तूरडाळीची उसळ, दहीभात, शेंगदाणे चटणी, गावरान वांग्याची भाजी, लोणचे आणि नाचणी आंबील यासारख्या पदार्थांचा समावेश असतो.