सकाळ डिजिटल टीम
उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला थंडावा देणारा आणि पाण्याची गरज भागवणारा कारल्याचा रस अनेक आरोग्यदायी गुणधर्मांनी युक्त आहे. मात्र, मधुमेहाच्या रुग्णांसाठी रोजच्या आहारात कारल्याचा रस समाविष्ट करणे योग्य आहे का?
हो, मधुमेही रुग्ण कारल्याचा रस प्रमाणात पिऊ शकतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी तात्पुरती कमी होऊ शकते. मात्र, हा रस डॉक्टरांनी दिलेल्या औषधांऐवजी कधीही वापरू नये.
कारल्याचा रस सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास चांगला परिणाम होतो. यामुळे दिवसभर रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहण्यास मदत होते.
इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवतो.
पचनक्रिया सुधारतो.
यकृताचे कार्य बळकट करतो.
रक्तातील साखरेची पातळी कमी करतो.
वजन कमी करण्यास सहाय्यक ठरतो.
अतिप्रमाणात कारल्याचा रस घेतल्यास हायपोग्लायसेमिया (रक्तातील साखर अत्यंत कमी होणे) होऊ शकतो.
काही जणांना पोट बिघडणे किंवा अपचन होण्याचा त्रास होऊ शकतो.
गर्भवती महिलांनी कारल्याचा रस घेणे टाळावे.
याची चव खूप कडू असल्याने काही जणांना पिणे कठीण वाटू शकते.
कारल्याच्या रसाची कडवट चव सौम्य करण्यासाठी खालील पदार्थ वापरू शकता..
लिंबाचा रस
आलं
पुदिना
काकडी
काळं मीठ