संतोष कानडे
अहिल्यानगर (जुनं अहमदनगर) येथील निजामशाही आणि हैदराबादची निजाम राजवट या दोन वेगवेगळ्या सत्ताकाळातील राजवटी होत्या.
अहमदनगरच्या निजामशाहीची स्थापना १४९० मध्ये मलिक अहमद निजाम शाह -१ याने केली होती.
अहमदनगर शहराचे नावही अहमद निजामशहा त्याच्या नावावरून ठेवण्यात आले होते.
त्याकाळी निजामशाही ही दख्खनमधील एक प्रभावशाली सल्तनत मानली जायची.
अहमदनगरच्या निजामशाहीचा अंत १६३६ मध्ये मुघल साम्राज्याच्या विस्तारामुळे झाला.
हैदराबादच्या निजाम राजवटीची स्थापना नंतर १७२४ मध्ये असिफ जाह-१ याने केली होती.
हैदराबादचे निजाम हे आसफजाही घराण्यातील होते, तर अहमदनगरची निजामशाही वेगळ्या घराण्याची होती.
दोन्ही राजवटींमध्ये सुमारे ८८ वर्षांचे अंतर असल्यामुळे त्या एकाच सत्तेचा भाग नव्हत्या.
'निजाम' हा शब्द दोन्ही ठिकाणी वापरला गेला असला तरी त्यांचा इतिहास, राजधानी आणि शासक वेगळे होते.
अहिल्यानगरची निजामशाही आणि हैदराबादच्या निजामांची राजवट यांना स्वतंत्र ऐतिहासिक सत्ताकेंद्रे म्हणून पाहिले जाते.