दिवाळीत उटणे का लावावे? जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे

Monika Shinde

उटणं म्हणजे काय?

उटणं म्हणजे हळद,क चंदन, डाळी वगैरे एकत्र करून बनवलेलं एक नैसर्गिक लेप आहे. दिवाळीच्या पहाटे उटणं लावण्याची परंपरा खूप जुनी आहे.

परंपरा आणि आरोग्याचा संगम

दिवाळीत उटणे लावण्याची परंपरा केवळ शारीरिक स्वच्छतेसाठी नसून, ती आयुर्वदिक उपचारांची एक पद्धत आहे.

त्वचा साफ होते

उटणं लावण्याने त्वचेवरचं मळ, तेल आणि मृत पेशी निघून जातात. ज्यामुळे त्वचेला नैसर्गिक तेज आणि उजळपणा मिळतो. दिवाळीसाठी हे एक उत्तम सौंदर्य उपचार आहे.

थकवा कमी होतो

उटणं लावल्याने फक्त शरीरच नव्हे, तर मनही प्रसन्न राहतं. त्याचा थंडावा आणि सुगंधामुळे सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळते.

शरीरातील दुर्गंधी दूर

उटणाचे घटक शरीरातील दुर्गंधी दूर करतात. हळद आणि चंदनासारख्या सुगंधी औषधी घटकांमुळे दिवाळीच्या दिवसात दिवसभर ताजेपणा राहतो.

त्वचा त्रासांवर उपाय

आयुर्वेदानुसार उटणं लावल्याने शरीरातील उष्णता नियंत्रित होते. त्यामुळे सांधेदुखी, पुरळ, त्वचेची खाज यासारख्या समस्यांवर आराम मिळतो.

मन प्रसन्न होतं

उटणं लावल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि मन प्रसन्न होत

हाडं बळकट होण्यासाठी गायीचं की म्हशीचं दूध कोणतं आहे जास्त उपयुक्त?

येथे क्लिक करा