Aishwarya Musale
उपवास केल्याने शरीर पूर्णपणे डिटॉक्स होते. उपवास वजन नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी असल्याचे सांगितले जाते. पण दिवसभर उपवास केल्यानंतर संध्याकाळी भरपूर अन्न खाल्ले तर फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते.
खरे तर दिवसभर उपाशी राहिल्यानंतर अचानक काही गोष्टी खाणे टाळावे कारण त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. चला जाणून घेऊया उपवास सोडताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत.
दिवसभर उपवास केल्यावर, सर्वात प्रथम आपण मसालेदार अन्न टाळावे. मसालेदार अन्न खाल्ल्याने पोटदुखी, अपचन आणि गॅसचा त्रास होऊ शकतो.
आंबट फळे रिकाम्या पोटी खाल्ल्याने अपचन आणि ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो आणि तुमचे आरोग्य बिघडू शकते.
काही लोक उपवास सोडताना संध्याकाळी चहा आणि कॉफी पितात. हे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
दिवसभर न जेवल्यानंतर संध्याकाळी चहा किंवा कॉफी प्यायल्यास तुमची चयापचय क्रिया कमकुवत होतेच पण तुम्हाला ॲसिडिटीचा त्रासही होऊ शकतो.
जर तुम्ही उपवास सोडत असाल तर शरीरातील पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी आधी एक ग्लास पाणी प्यावे.
यानंतर तुम्ही दही, रस, नारळपाणी पिऊ शकता. हे तुमचे शरीर हायड्रेट करेल आणि तुमच्या शरीरात ऊर्जा आणेल.