Payal Naik
बॉलिवूडमध्ये एकच ट्रॅजिडी क्वीन होऊन गेली ती म्हणजे मीना कुमारी. तिच्या चित्रपटातील उदासीन पात्रांमुळे तिला ट्रॅजेडी क्वीन ही पदवी मिळाली.
मात्र तिचं वैयक्तिक आयुष्य हे खाचखळग्यांनी भरलेलं होतं. तिच्या आयुष्यात दुःख आणि फक्त दुःखच होतं.
तिचं दुख, आयुष्यतील एकटेपण, नैराश्य हे सगळं तिच्या लोकप्रियतेच्या चादरीखाली झाकलं गेलं.
तिला कधीकधी भारतीय चित्रपटांची सिंड्रेला असेही संबोधण्यात येत होते. ती विवाहित कमाल अमरोही यांच्या प्रेमात पडली.
मात्र कमाल यांच्या प्रेमाने तिला फक्त आणि फक्त निंदा दिली. त्यांनी लग्न तर केलं. मात्र तिला सुख नाही लाभलं
शेवटी मीनाकुमारी दारूच्या नशेत बुडून गेली आणि ३१ मार्च १९७२ साली तिचा मृत्यू झाला.
मात्र तिच्या कबरीशेजारी कुणाची कबर आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का?
मीना कुमारी हिचं ज्यांच्यावर सगळ्यात जास्त प्रेम होतं ते कमाल अमरोही यांचं मीना कुमारीच्या मृत्यूच्या २१ वर्षांनी निधन झालं.
त्यांना मुंबईतील भारतीय-इराणी स्मशानभूमी असलेल्या रहमताबाद कब्रिस्तानमध्ये मीना कुमारींच्या शेजारी दफन करण्यात आले.
मुंबई-पुण्यापासून हाकेच्या अंतरावर पण प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसचं भाडं किती?