कार्तिक पुजारी
१९६२ साली देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु होते. त्यावेळी जनसंघ एक मोठा पक्ष नव्हता. त्याला मिळणारी देगणी मर्यादित होती.
अटल बिहारी वाजपेयी तरुण नेते होते. आपल्या भाषणामुळे ते प्रसिद्ध होते.
वाजपेयी १९६२ मध्ये राज्यसभेवर निवडून आले. पंडित दीनदयाल उपाध्याय यांना वाजपेयी संसदेत असावेत असं वाटत होतं.
स्वातंत्र्यानंतरच्या काळात छोट्या पक्षांना पैशांची कमतरता भासायची. काँग्रेस एकमेव मोठा पक्ष होता.
अनेक उद्योगपती काँग्रेस पक्षालाच देणगी द्यायचे. जनसंघाला देखील कमी पैशांमुळे झगडावं लागत होतं.
ऑगस्ट १९६२ मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी राज्यसभेत एक प्रायवेट मेंबर विधेयक आणलं होतं.
यामध्ये कंपनी अॅक्ट, १९५६ मध्ये दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.