१९६५च्या युद्धात लाल बहादूर शास्त्रींनी RSS कडे केल होतं मदतीच आवाहन

सकाळ वृत्तसेवा

शास्त्रींचं संघाकडे मदतीचं आवाहन!

१९६५ मध्ये युद्धाच्या काळात पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी सरसंघचालक गोळवलकर यांना दिल्लीत शांतता राखण्यासाठी मदत मागितली होती.

Lal Bahadur Shastri and RSS | Sakal

११ सप्टेंबर १९६५: युद्ध तेजीत

पंजाब सीमेवरून भारतीय लष्कर सियालकोटकडे सरसावलं होतं.

Lal Bahadur Shastri and RSS | Sakal

पाकिस्तानकडून जोरदार हल्ले

वजिराली भागातून १३५ रणगाड्यांसह पाकिस्तानी दल फिल्लोरकडे येत होतं. एअरफोर्सही हल्ले करत होती.

Lal Bahadur Shastri and RSS | Sakal

देशात अंतर्गत शांततेचा धोका

बाह्य युद्धात पोलिस दल व्यस्त असताना अंतर्गत अस्थिरतेचा धोका वाढला होता. ही बाब शास्त्रींनी गंभीरतेने घेतली.

Lal Bahadur Shastri and RSS | Sakal

गुरुजींना दिलं आमंत्रण

पंतप्रधान शास्त्रींनी सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांना दिल्लीत बोलावलं आणि स्वयंसेवकांची मदत मागितली.

Lal Bahadur Shastri and RSS | Sakal

वाहतूक आणि सुरक्षा संघाकडे

संघ स्वयंसेवकांनी राजधानीतील वाहतूक आणि सुरक्षिततेची जबाबदारी स्वीकारली. पोलीस दलाला मोठा दिलासा मिळाला.

Lal Bahadur Shastri and RSS | Sakal

स्वयंसेवक सीमेवरही पोहोचले

दिल्लीपुरत मर्यादा न राहता स्वयंसेवक सीमेवरही गेले आणि जवानांना जेवण वाटप केलं.

Lal Bahadur Shastri and RSS | Sakal

वैचारिक मतभेद बाजूला

शास्त्रींनी वैचारिक मतभेद बाजूला ठेवत राष्ट्रीय हितासाठी संघाचा सल्ला घेतला, हे लालकृष्ण अडवाणींनीही नोंदवलं आहे.

Lal Bahadur Shastri and RSS | Sakal

१७ दिवसांत भारताचं जोरदार प्रत्युत्तर

भारतीय लष्कराच्या जोरदार हल्ल्यामुळे पाकिस्तानला माघार घ्यावी लागली. संयुक्त राष्ट्राला हस्तक्षेप करावा लागला.

Lal Bahadur Shastri and RSS | Sakal

२३ सप्टेंबर १९६५: युद्धविराम

२३ सप्टेंबर रोजी युद्धविराम घोषित झाला. भारताचं सैन्य आणि जनता यांच्या एकतेमुळे युद्ध भारतानं जिंकलं.

Lal Bahadur Shastri and RSS | Sakal

संदर्भ-

ही माहिती डॉ. हरिश्चंद्र बर्थवाल यांनी The Rashtriya Swayamsevak Sangh: An Introduction या पुस्तकात दिली आहे.

Lal Bahadur Shastri and RSS | Sakal

मॉडेल ते अर्थतज्ञ! कोण आहे कर्नल सोफिया कुरेशी यांची ऑलराउंडर जुळी बहीण?

Shyna Sunsara | Sakal
येथे क्लिक करा