Pranali Kodre
इंडियन प्रीमयर लीग २०२५ स्पर्धेचे विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकले.
३ जून रोजी झालेल्या अंतिम सामन्यात बंगळुरूने पंजाब किंग्सला ६ धावांनी पराभूत केले.
१८ वर्षांपासून ही स्पर्धा खेळणाऱ्या बंगळुरू संघाने पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले आहे.
हा विजय विराट कोहलीसाठीही खूप खास ठरला.
गेली १८ वर्षे बंगळुरूकडून खेळणाऱ्या विराटचीही प्रतिक्षा पूर्ण झाली.
दरम्यान, बंगळुरूच्याविजयानंतर कर्णधार रजत पाटिदारसह विराट कोहली आणि इतर बंगळुरूच्या खेळाडूंनी 'ए साला कप नामदू' अशा घोषणा दिल्या.
पण 'ए साला कप नामदू' या वाक्याचा नेमका अर्थ काय असा प्रश्न अनेकांना पडला असले.
'ए साला कप नामदू' हे एक कन्नड वाक्य आहे. याचा अर्थ होतो की 'यावेळी कप आमचा आहे!'