सकाळ डिजिटल टीम
पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी किंवा मैत्री, प्रत्येक नात्याला चढ-उतारांचा सामना करावा लागतो. यातूनच नातं भक्कम होतं.
प्रेमसंबंधात तर हे चढउतार महत्त्वाचे ठरतात. प्रत्येक टप्प्यावर हे नाते संबंध आणखी भक्कम होतात.
प्रेमाच्या नात्यात आकर्षण हा पहिला टप्पा आहे. समोरच्याला जास्त न ओळखता फक्त पाहून आणि एक दोन भेटीतच आपण त्याच्याकडे ओढले जातो.
प्रेमाच्या नात्यातला दुसरा टप्पा हा हनीमून किंवा डेटचा आहे. यात भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न होतो आणि प्रेमात हे महत्त्वाचं असतं.
पार्टनरशी भावनिक नातं निर्माण होणं हा तिसरा टप्पा आहे. यात एकमेकांच्या सुख-दु:खाचा विचार केला जातो. भविष्याचा प्लॅन तयार करून नात्याबाबत निर्णय घेतला जातो.
भावनिक टप्प्यानंतर पुढचा टप्पा महत्त्वाचा ठरतो. नात्याबद्दल तुम्हाला निर्णय घेताना समोरचा आपल्याशी किती प्रामाणिक आहे, कटिबद्ध आहे हे तपासलं जातं.
प्रेमातला शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा असा हा टप्पा आहे. एकमेकांच्या चांगल्या-वाईट गोष्टी समजून घेऊन त्यांना स्वीकारलं जातं. त्यांच्यावर विश्वास ठेवला जातो.