सकाळ डिजिटल टीम
पन्हाळा किल्ल्याजवळच मार्कंडेय टेकडीला छत्रपती महाराजांनी तट आणि बुरुजांनी बंदिस्त करून घेत गड बनवलं होतं. त्यालाच पावनगड म्हणून ओळखलं जातं.
Pawangad
Esakal
१६७३ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पावनगड बांधला. पन्हाळा किल्ल्याच्या सुरक्षेसाठी या किल्ल्याची बांधणी करण्यात आली होती.
Pawangad
Esakal
शिवरायांनंतरही महाराणी ताराराणींच्या कारकिर्दीत औरंगजेबाने वेढ्यावेळी पावनगडामुळे लाखाच्या सैन्याचा हल्लाही परतवून लावता आला.
Pawangad
Esakal
१८४४ मध्ये इंग्रजांनी अनेक किल्ल्यांवर हल्ले केले होते. तेव्हा पावनगडाचे दरवाजे आणि किल्ल्यावर असलेल्या काही वास्तू उद्ध्वस्त केल्या गेल्या.
Pawangad
Esakal
पावनगडावर प्राचीन शिवमंदिर असून त्याच्या मागच्या बाजूला गायीच्या तुपाची विहीर आहे. सैनिकांच्या जखमांवर लावण्यासाठी या तुपाचा वापर केला जायचा.Esakal
Pawangad
Esakal
जोतिबा डोंगर आणि पन्हाळ्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या कासारी आणि वारणा नदीच्या खोऱ्याचा बहुतांश भाग पावनगडाच्या पूर्व टोकावर असणाऱ्या बुरुजावरून दिसतो.Pawangad
Pawangad
Esakal
१६७३ मध्ये शिवरायांनी पावनगडाच्या बांधकामाची जबाबदारी अर्जोजी यादव व हिरोजी फर्जंद यांनी पार पाडली. १७०१ मध्ये औरंगजेबाने हा गड जिंकण्याचा प्रयत्न केला होता.
Pawangad
Esakal
पन्हाळा किल्ल्याच्या पूर्वेला असलेल्या पावनगडाकडे जाणारा रस्ता गर्द झाडीतून जातो. शांतता आणि निसर्गसौंदर्याने नटलेला हा गड आहे.
Pawangad
Esakal