Pranali Kodre
श्रेयस अय्यरला ६ जून २०२६ रोजी भारताचा टी२० कर्णधार म्हणून बीसीसीआयकडून नियुक्त केले.
Shreyas Iyer
Sakal
श्रेयस अय्यर आता भारताचा १५ वा टी२० कर्णधार बनला आहे.
Shreyas Iyer
Sakal
याशिवाय देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करत असताना भारताचा टी२० कर्णधार बनणारा तो चौथा खेळाडू आहे.
Shreyas Iyer
Sakal
यापूर्वी मुंबईच्या अजिंक्य रहाणेने सर्वात आधी २०१५ मध्ये २ टी२० सामन्यात भारताचे नेतृत्व केले होते, ज्यात एक विजय आणि एक पराभव स्वीकारला होता.
Ajinkya Rahane
Sakal
त्यानंतर मुंबईच्या रोहित शर्माने २०१७ ते २०२४ दरम्यान ६२ टी२० सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले, ज्यात ४९ विजय, १२ पराभव आणि १ बरोबरी स्वीकारली.
Rohit Sharma
Sakal
मुंबईच्या सूर्यकुमार यादवने २०२३ ते २०२६ दरम्यान ५२ टी२० सामन्यांत भारताचे नेतृत्व करताना ४० विजय, ८ पराभव आणि २ बरोबरी स्वीकारली.
Suryakumar Yadav
Sakal
आता श्रेयस सूर्यकुमारची जागा घेणार असून भारताचे टी२०मध्ये नेतृत्व करताना दिसेल.
Shreyas Iyer
Sakal
दरम्यान, या चौघांशिवाय विरेंद्र सेहवाग, एमएस धोनी, सुरेश रैना, विराट कोहली, शिखर धवन, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिल यांनीही भारताचे टी२०मध्ये नेतृत्व केले आहे.
Virat Kohli - MS Dhoni
Sakal
Shreyas Iyer - India New T20I Captain
Sakal