Shubham Banubakode
राज्यात आपल्यालाला ठिकठिकाणी गोरक्षण संस्था दिसते. या गोरक्षण संस्थेत गायींचा सांभाळ केला जातो.
पण तुम्हाला माहिती आहे का? की ही गोरक्षण संस्था नेमकी कशी सुरु झाली?
राज्यात आज ज्या गोरक्षण संस्था आहेत, त्याची संकल्पना गाडगेबाबांनी मांडली होती.
गाडगेबाबांच्या संकल्पनेतूनच राज्यात गोरक्षणाची चळवळ उभी राहिली.
त्याकाळी शेतकरी म्हातारी गुरे कसाईला विकत. म्हाताऱ्या गुरांची व्यवस्था हा बिकट प्रश्न होता.
गुरांना काम झालं की विकणं बरोबर नाही, असं गाडगेबाबा म्हणत. गुरांना कसाईच्या हाती देणं बाबांना आवडत नसे.
म्हाताऱ्या गुरांसाठी एखादी संस्था उभी करावी, असा विचार गाडगेबाबा करू लागली.
त्यासाठी ते जागेच्या शोधात होते. मूर्तिजापूरला नानासाहेब जमादार नावाचे एक श्रीमंत गृहस्थ होते.
कसाई बाजाराला लागूनथ त्यांची भरपुर शेती होती. ते स्वभावाने सालस व दानशूर वृत्तीचे होते.
गाडगेबाबांशी त्यांचा थोडाफार परिचय होता. नानासाहेबांना बाबांच्या कार्याची प्रचिती व तळमळ माहित होती.
अनाथ गुरांच्या संस्थेसाठी कार्य करण्याची इच्छा बोलून दाखवित्ताच नानासाहेबांनी बाजाराला लागून असलेली ५६ एकर शेती देण्याचे कबूल केले.
कामाला सुरवात झाली. बाबांच्या प्रेरणेने मूर्तिजापूरला पहिली गोरक्षण संस्था आकार घेऊ लागली.
काही दिवसांतच म्हाताऱ्या गुरांना लोक गोरक्षणात आणून सोडू लागले. त्यासोबत चारापाणी, कुटार कडबाही आणून देऊ लागले.
कसायाचा रोष बाबांना पचवाचा लागला. पण जनतेच्या दृष्टीने एका नवीन कामाची सुरवात करून बाबांनी त्यांना वाईटापासून परावृत्त केले.
भूतदयेचा हा उत्कृष्ट नमूना होता. यानंतर अशा गोरक्षण संस्था गावोगांव उभ्या होऊ लागल्या. आज या गोरक्षणाचं जाळं राज्यभर पसरलं आहे.
महाराष्ट्र राज्य साहित्य महामंडळद्वारा प्रकाशित संत गाडगेबाबा ( काल आणि कर्तृत्व) पुस्तकातील लेख