Sandeep Shirguppe
पावसात भिजल्यानंतर गरम होण्यासाठी तुम्हाला आल्याचा चहा अत्यंत गुणकारी ठरेल. अनेक समस्यांवरही आराम मिळेल.
आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते.
पावसाळ्यात घसा खवखवत असेल तर शेख मिळण्यासाठी आल्याचा चहा त्वरित आराम देतो.
आले पचन सुधारण्यास मदत करते आणि पोटदुखी, गॅस आणि अपचनाच्या समस्यांवर आराम देते.
काही तज्ज्ञाच्या अभ्यासानुसार, नियमीत आल्याचा चहा पिणाऱ्यांमध्ये उच्च रक्तदाबाचा धोका कमी होण्यास मदत होते.
पावसामध्ये भिजल्यानंतर शरिरातील ऊर्जा निर्माण होण्यासाठी आल्याचा चहा शरीरातील उष्णता वाढवेल.
आल्याचा चहा भूक नियंत्रित करतो आणि वजन कमी करण्यास मदत करतो.
आल्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे त्वचेसाठी चांगले असतात.