संतोष कानडे
दिल्लीवर राज्य करणारे शिंदे जोतिबासमोर नतमस्तक व्हायचे. शिंद्यांची श्रद्धा आणि पराक्रमाचा हा इतिहास आहे.
त्यांचा देव दिल्लीच्या महालात नव्हता, तर कोल्हापुरातल्या वाडी रत्नागिरीच्या डोंगरावर होता.
“डोंगरचा जोतिबा, छत्रपतींचा भगवा ध्वज” हे शिंद्यांचे प्रसिद्ध वाक्य आहे.
शिंद्यांच्या राजमुद्रांची सुरुवात ‘श्री जोतीस्वरूप चरणी तत्पर’ अशी होत असे.
राणोजी शिंद्यांनी मुलाचं नाव जोतिबा ठेवलं होतं.
1730 साली राणोजी शिंद्यांनी जोतिबा मंदिराचा भव्य जीर्णोद्धार केला.
काळ्या दगडात उभारलेला केदारलिंगाचा गाभारा आणि उंच शिखर आजही पाहायला मिळते.
केदारेश्वर आणि यमाई देवीची मंदिरेही शिंद्यांनी उभारली होती.
जोतिबाच्या यात्रेत पहिला नैवेद्य शिंदे घराण्याचा असतो, ही परंपरा आजही कायम आहे.
सत्ता आणि संपत्ती असूनही शिंद्यांनी आपली मुळे जोतिबाच्या चरणीच ठेवली. श्रद्धेचा वारसा कधीही विसरला नाही.