सकाळ डिजिटल टीम
आयपीएल २०२५ हंगाम सुरू होण्यास अवघे तीन दिस शिल्लक असताना मुंबई इंडियन्स संघात मोठी घडामोड घडली आहे.
मुंबई इंडियन्स IPL 2025 मध्ये पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्जविरूद्ध भिडणार आहे.
मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२५ च्या पहिल्या सामन्यात नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात खेळावे लागणार आहे.
या सामन्यात मुंबईचा कॅप्टन हार्दिक पांड्या खेळू शकणार नाही.
आयपीएलच्या मागील पर्वात हार्दिकवर वेळेत षटक पूर्ण न केल्याची चूक दोन वेळा केल्यामुळे कारवाई करण्यात आली होती.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर तो पुन्हा मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करेल अशी चर्चा रंगली होती.
पण मुंबईला पाच वेळा विजेतेपद मिळवून देणाऱ्या रोहित शर्मावर नाही तर दुसऱ्याच खेळाडूवर मुंबईने कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे.
चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात रोहित नव्हे तर सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) नेतृत्व करणार असल्याचे हार्दिकने पत्रकार परिषदेत जाहीर केले.