रोहित कणसे
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या सध्या चांगलाच चर्चेत आहे.
हार्दिकने यापूर्वी गुजरात टायटन्सचा कर्णधार होता, त्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने २०२२ मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकली होती.
पण तुम्हाला माहिती आहे का की, टीम इंडियाकडून ऑलराउंडर म्हणून खेळणारा हार्दिक पांड्या खूप कमी शिकलेला आहे.
मीडिया रिपोर्सनुसार हार्दिक पांड्या ९वी पर्यंतच शिक्षण घेतलं आहे.
क्रिकेटवर असलेल्या प्रेमापोटी हार्दिकने शिक्षण अर्धवट सोडल्याचं सांगितलं जातं. अगदी कमी वयात त्याने क्रिकेटमध्ये करियर करण्याचा निर्णय घेतला होता.
लहानपणी कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने हार्दिकला सुरुवातीला अत्यंत गरीबीमध्ये दिवस काढावे लागले होते.
गरीबी आणि क्रिकेटवर असलेलं आमाप प्रेम यामुळेच हार्दिक पांड्या सध्या जगातील टॉप ऑलराउंडर बनला आहे.
हार्दिकची कमाई सध्या कोट्यवधींमध्ये असून तो अत्यंत लक्झरी आयुष्य जगतो.
रिअलमीचा स्वस्तात मस्त 5G स्मार्टफोन लाँच; टॉप मॉडेलची किंमत केवळ 15 हजार