संतोष कानडे
मुघलांच्या हरममध्ये जाड बायकांना जाणीवपूर्वक आणलं जात असे. त्यामागचं कारणदेखील रंजक आहे.
मुघल बादशहांच्या हरममध्ये शेकडो महिला असायच्या. ज्या मुघलांच्या प्रत्येक गरजा भागवायच्या.
'अकबरनामा' लिहिलेल्या अबू फजलने सांगितल्याप्रमाणे, अकबराच्या हरममध्ये साधारण पाच हजार महिला होत्या.
हरमच्या सुरक्षेसाठी महिला आणि किन्नरांची नियुक्ती केलेली असायची. कारण कुठल्याही पुरुषाची सावली हरमवरर पडता कामा नये.
कुठे किती पहारा द्यायचा हे हरममधल्या महिला ठरवायच्या. विशेषतः जिथे तरुणी आणि सुंदर महिला आहेत, तिथली सुरक्षा कडेकोट असायची.
सुरक्षेसाठी तीन लेअर बनवलेल्या असायच्या. पहिल्या टप्प्यात जाडजुड, वजनदार बायका असायच्या.
त्यांच्या हातात शस्त्र असयची. भाले, धनुष्य अशी शस्त्र त्या बाळगायच्या. गरज पडली तर त्यांचा वापरही करायच्या.
प्रामुख्याने हरमच्या सुरक्षेची जबाबदारी याच जाडजुड महिलांच्या खांद्यावर होती. काही महिला हरममधल्याच असायच्या.
सुरक्षेसाठी तैनात असलेल्या या महिलांना उज्बेकिस्तानच्या विविध ठिकाणांहून आणलं जायचं. तिथल्या महिला सैन्य प्रशिक्षणात अव्वल होत्या.
त्या कठोर आणि जाड महिला हरमला संरक्षण द्यायच्या. कुणालाही बाहेर पडू दिलं जात नसायचं.
एकदा एखादी महिला हरममध्ये दाखल झाली की पुन्हा तिला आयुष्यभर बाहेर पडता यायचं नाही.
जास्त वजनाच्या महिलांचा मुघल कशा पद्धतीने उपयोग करायचे, हे यावरुन दिसून येतंय.