संतोष कानडे
राजस्थानमधला भानगड किल्ला हे भारतातला सर्वात भुताटकी ठिकाण मानलं जातं. इथे सूर्यास्तानंतर प्रवेशबंदी असते.
पश्चिम बंगालमधलं हे ठिकाण. धुक्याने वेढलेलं हे हिल स्टेशन भारतातल्या सर्वात रहस्यमय ठिकाणांपैकी एक मानलं जातं. जंगलात आणि जुन्या शाळेजवळ विचित्र अनुभव आल्याच्या अनेक स्थानिक कथा प्रसिद्ध आहेत.
अंदमानातलं हे ठिकाण म्हणजे ब्रिटिश काळातील ओसाड इमारती आहेत. रात्री इथे हालचाली जाणवतात, असं स्थानिक म्हणतात.
राजस्थान इथलच हे ठिकाण एका रात्रीत संपूर्ण गाव ओस पडल्याची कथा आहे. आजही इथे पावलं टाकली की विचित्र शांतता जाणवते.
दार्जिलिंगमधल्या या ठिकाणी शाळेजवळ डोक्याविना फिरणाऱ्या मुलाची गोष्ट प्रसिद्ध आहे. स्थानिक लोक आजही रात्री या भागात जाणं टाळतात.
गुजरातमधल्या या बीचवर रात्री हसण्याचे आणि चालण्याचे आवाज ऐकू येतात अशी समजूत आहे. त्यामुळे सूर्यास्तानंतर मच्छीमार इथे थांबत नाहीत.
हे ठिकाण दिल्लीत आहे. पायऱ्या उतरत गेल्या की मन विचित्र शांततेत जातं. अनेकांना इथे अस्वस्थ वाटल्याचा अनुभव आलेला आहे.
वरील सर्व ठिकाणांबाबत कुठलेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. पण या ठिकाणांशी जोडलेल्या कहाण्यांमुळे लोक भयभीत होतात.