सकाळ वृत्तसेवा
मुखशुद्धीसाठी नियमित लवंग खाल्यास तोंडाला येणारी दुर्गंधी दूर होते.
शरीराची पचनप्रक्रियाही मजबूत होते.
सर्दी-खोकल्याची समस्याही दूर होते.
बद्धकोष्ठता, अॅसिडिटी, अपचन आणि पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.
रिकाम्या पोटी लवंग खाल्ल्यास शरीराची रोगप्रतिकारकशक्तीही वाढते.
लवंगमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडेंट्सचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे आजारांशी लढा देण्यास शारीरिक क्षमता वाढते.
लवंगीमुळे दातांचे दुखणेही कमी होते. कारण यामध्ये युजेनॉल नावाचे वेदना कमी करणाऱ्या घटकाचा समावेश आहे.