शिवाजी महाराजांच्या 'या' योजनेमुळे महाराष्ट्रातल्या नापीक जमिनी पिकाऊ झाल्या

Anushka Tapshalkar

स्वराज्यात शेतकऱ्यांना प्राधान्य

शिवाजी महाराजांच्या राज्यात शेतकऱ्यांना विशेष महत्त्व देण्यात आले. नापीक जमिनी पिकाऊ करण्यासाठी मोठ्या सवलती दिल्या गेल्या, जेणेकरून शेतीचा विकास होईल.

Priority for farmers in the country | sakal

नापीक जमीन पिकाऊ करण्यासाठी विशेष योजना

ज्या शेतकऱ्यांनी पडीत जमीन लागवडीखाली आणली, त्यांना पहिल्या पाच वर्षांसाठी संपूर्ण करमाफी देण्यात आली. त्यानंतर हळूहळू कर वाढवण्यात आला.

Special scheme for growing uncultivated land | sakal

झाडी तोडून लागवडीयोग्य जमीन तयार करण्यासाठी प्रोत्साहन

झाडी असलेल्या जागा शेतीस उपयुक्त करण्यासाठी खत, माती टाकण्यास आणि पेरणीयोग्य करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रेरित करण्यात आले.

Incentives to cut down trees to create cultivable land | sakal

नदीकिनारी शेतीसाठी विशेष सवलती

नद्यांच्या प्रवाहामुळे अदृश्य झालेल्या जमिनींना शेतीयोग्य करण्यासाठी बांध घालण्याची परवानगी देण्यात आली. त्यासाठी अनेक वर्षे मेहनत घेणाऱ्या शेतकऱ्यांना सवलती देण्यात आल्या.

Special concessions for riverside agriculture | sakal

गाव वसवण्यासाठी शेतकऱ्यांना मदत

गाव वसवण्यासाठी शेतकऱ्यांना गुरेढोरे, बैल पुरवले गेले. शिवाय, शेती सुरू करण्यासाठी सुरुवातीला धान्य देऊन त्यांना स्थिरस्थावर केले गेले.

Help farmers set up villages | sakal

अवर्षणग्रस्त शेतकऱ्यांसाठी करमाफी

ज्या शेतकऱ्यांना दुष्काळामुळे स्थलांतर करावे लागले, त्यांना परत आणून पुन्हा शेती करण्यास उद्युक्त करण्यासाठी करमाफी देण्यात आली.

Tax exemption for drought-hit farmers | sakal

शेतीला बाधा येणाऱ्या अडचणींवर उपाय

लष्करी हालचाली, टोळधाड, रोगराई आणि स्वाऱ्या यांमुळे शेतीचे नुकसान होई. शिवाजी महाराजांनी हे संकट दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

Solutions to problems affecting agriculture | sakal

गावांवर हल्ले आणि लुटमारीला आळा

गावांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी स्वराज्यात मजबूत संरक्षण व्यवस्था तयार करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला.

Preventing attacks and looting of villages | sakal

शिवरायांची कृषीनीती: शेतकऱ्यांसाठी संरक्षक ढाल

शिवाजी महाराजांचे धोरण केवळ करमाफीपुरते मर्यादित नव्हते, तर त्यांनी शेतकऱ्यांचे संरक्षणही सुनिश्चित केले. त्यांच्या काळात शेतकरी निर्भयपणे शेती करू शकत होते.

Shivaji's Agricultural Policy: A Protective Shield for Farmers | sakal

सात दिवस चालला होता शिवराज्यभिषेक सोहळा; कोणते विधी पार पडले?

आणखी वाचा..