सकाळ वृत्तसेवा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाच्या वेळी रायगडावर किती संपत्ती जमा झाली होती त्याचे तपशील वाचून तुमचं डोळ्यांवर विश्वास बसणार नाही!
रायगडावर ९ खंडी सोनं, ५ खंडी चांदी, ५ लाख सोन्याचे होन आणि ३ लाख होन अधिकाऱ्यांकडे खरेदीसाठी दिलेले होते.
स्वराज्याकडे ३० हजार तलवारी, ५० हजार दुधारी तलवारी, ४० हजार धनुष्य, १८ लाख बाण, ४० हजार भाले, ६० हजार ढाली आणि ६० हजार लाँग डर्कस् होती.
२७० खंडी सैंधव, २०० खंडी जिरे, २०० खंडी गोपीचंद, २०० खंडी गंधक आणि प्रचंड प्रमाणात सुगंधी पदार्थ साठवलेले होते.
गडावर ३ खंडी तांबे, ४५० खंडी शिसे, २० खंडी लोखंड, ४०० खंडी जस्त मिश्र धातू आणि २७२ खंडी ब्राँझ इतका धातूंचा साठा होता.
धान्यांमध्ये १७ हजार खंडी भात, ७० हजार खंडी तेल, तसेच मोठ्या प्रमाणात डाळी, साखर आणि तंबाखूचा साठा होता.
रायगडावर ४००० पांढऱ्या ठाण्या, १००० बहऱ्हाणपुरी कापड, ३००० सामान्य कपडे, ४००० पैठणीचे तागे आणि लाखभर हलकं कापड होते.
हा खजिना ५१ हजार तोळे सोनं, २०० तोळे माणकं, १००० तोळे मोती, ५०० तोळे हिरे आणि ४० हजार डर्कस् ने भरलेला होता.
रायगडाव्यतिरिक्त इतर किल्ल्यांवरही ३० लाख होनांची संपत्ती होती. जामदारखान्याची तपासणी १६८० साली खुद्द संभाजीराजांनी केली होती.