सकाळ डिजिटल टीम
उन्हाळ्यात नैसर्गिक जलस्रोत आटत असल्याने पक्षी आणि भटके प्राणी पाण्यासाठी तडफडतात. त्यांना मदत करणे गरजेचे आहे.
घराच्या बाल्कनीत, गॅलरीत, छतावर किंवा बागेत मातीच्या भांड्यात स्वच्छ पाणी ठेवा. हे भांडे सावलीत असावे.
गर्मीमुळे पाणी लवकर गरम होते किंवा दूषित होते. त्यामुळे रोज पाणी बदला, जेणेकरून पक्षी आजारी पडणार नाहीत.
शहरात पक्ष्यांना घरटे बांधण्यासाठी जागा मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी घराच्या आवारात कृत्रिम घरटी लावा.
जलस्रोतांच्या कमतरतेमुळे पाण्यासाठी पक्षी तडफडतात. शक्य असल्यास, सार्वजनिक ठिकाणी पाणपोई लावा.
पक्ष्यांसाठी तांदूळ, बाजरी, ज्वारीचा भरडा आणि फळांची साल टाकून ठेवा. तेलकट अन्न टाळा.
जखमी पक्षी आढळल्यास त्याला सावलीत ठेवा आणि थेंबथेंब पाणी पाजून मदत करा. थेट पाण्यात बुडवू नका.
प्राणी-पक्षी वाचले तर निसर्गाचा समतोल राखला जाईल. त्यांना मदत करणे ही आपली जबाबदारी आहे!