सकाळ डिजिटल टीम
माठाची नियमित स्वच्छता ही पाण्याच्या थंडतेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. नारळाची शेंडी किंवा राख वापरून माठ स्वच्छ करा.
माठाभोवती ओले कापड गुंडाळल्यास बाष्पीभवनाची क्रिया वाढते आणि पाणी नैसर्गिक थंड राहते.
माठाभोवती माती किंवा वाळूचा थर ठेवल्यास थंडी टिकून राहते. ग्रामीण भागातील परंपरागत उपाय.
काळ्या रंगाचा माठ उष्णतेपासून संरक्षण करतो आणि पाणी अधिक काळ थंड ठेवतो.
थोडा वेळ माठ उन्हात ठेवल्यास बाह्य भागातून बाष्पीभवन होते व पाणी थंड होते. मात्र, फार वेळ उन्हात ठेवू नका.
माठातील पाणी दररोज किंवा दोन दिवसांनी बदला. यामुळे पाणी स्वच्छ व थंड राहते.
वाऱ्याची थोडीशी झुळूक असलेल्या ठिकाणी माठ ठेवल्यास बाष्पीभवन अधिक प्रभावी होते.
माठाच्या छिद्रांमधून पाणी बाष्परूपात बाहेर पडते आणि या प्रक्रियेमुळे आतले पाणी थंड राहते हीच यामागील नैसर्गिक शास्त्रीय प्रक्रिया आहे.