छत्रपती शिवाजी महाराजांचे ४०० घोडे कुणी चोरले होते? घनदाट जंगलात काय घडलं होतं?

Sandip Kapde

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपल्याला त्यांच्या जीवनाविषयी जाणून घेण्यात मोठी उत्सुकता असते.

How were Chhatrapati Shivaji Maharaj 400 horses stolen from the forests of Tamil Nadu | esakal

इतिहास

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देखील थरारक आहे. एक असा किस्सा आहे की तामिळनाडूच्या जंगलात महाराजांचे ४०० घोडे चोरीला गेले होते.

How were Chhatrapati Shivaji Maharaj 400 horses stolen from the forests of Tamil Nadu | esakal

तामिळनाडू

तामिळनाडूच्या घनदाट जंगलात हा प्रकार घडला. ही घटना लिहून ठेवण्यात आली आहे.

How were Chhatrapati Shivaji Maharaj 400 horses stolen from the forests of Tamil Nadu | esakal

महाराष्ट्र

महाराष्ट्रापासून १२०० कि.मी. दूरच्या अनोळखी प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांची मोहीम होती

How were Chhatrapati Shivaji Maharaj 400 horses stolen from the forests of Tamil Nadu | esakal

दक्षिण भारत मोहीम

छत्रपती शिवाजी महाराजांची दक्षिण भारत मोहीम डिसेंबर १६७६ ते एप्रिल मे १६७८ तब्बल दिड वर्ष सुरु होती.

How were Chhatrapati Shivaji Maharaj 400 horses stolen from the forests of Tamil Nadu | esakal

संदर्भ

सभासद बखर व इंग्लीश रेकॉर्डनुसार शिवाजी महाराजांनी विस हजार घोडदौड व ३० हजार पायदळ सैन्य घेतले होते.

How were Chhatrapati Shivaji Maharaj 400 horses stolen from the forests of Tamil Nadu | esakal

घोडे

या मोहिमेदरम्यान स्वत: छत्रपती शिवाजी महाराज छावणीत असताना ४०० घोडे चोरीला गेल्याची घटना घडली.

How were Chhatrapati Shivaji Maharaj 400 horses stolen from the forests of Tamil Nadu | esakal

वर्णन

हा प्रकार ज्यांनी पाहिला ते जर्मेन व कॅटेलने याने घोडे कसे चोरीला गेले याचे वर्णन केले. मार्टिनच्या डायरीत हा उल्लेख आहे.

How were Chhatrapati Shivaji Maharaj 400 horses stolen from the forests of Tamil Nadu | esakal

शिवराय

शिवराय आपल्या सैन्यासह तामिळनाडूमध्ये दाखल झाले. तेव्हा दक्षिण भारतातून आदिलशाही सत्तेचे उच्चाटन सुरु झाले.

How were Chhatrapati Shivaji Maharaj 400 horses stolen from the forests of Tamil Nadu | esakal

बंगळुरु

बंगळुरु, जिंजी, वेल्लोर, सालेम, पाँडीचेरी, अरेलूर, तंजावर या भागात महाराजांची मोहीम होती.

How were Chhatrapati Shivaji Maharaj 400 horses stolen from the forests of Tamil Nadu | esakal

कोल्लीडम

कोल्लीडम भागात मुख्य सुभेदार होता शेरखान लोधी २० मे १६७७ रोजी जिंजीचा किल्ला शिवरायांनी जिंकला.

How were Chhatrapati Shivaji Maharaj 400 horses stolen from the forests of Tamil Nadu | esakal

शेरखान

महाराजांना शेरखानाला भुईसपाट करायचे होते. तिरुवाडीलच्या लढाईत पराभूत होऊन शेरखान पळाला.

How were Chhatrapati Shivaji Maharaj 400 horses stolen from the forests of Tamil Nadu | esakal

घोडे

मराठ्यांच्या तुकडीने त्याचा पाठलाग करुन २७० घोडे, २० उंट, कित्येक बैल. तंबू, नगारे, जप्त केले.

How were Chhatrapati Shivaji Maharaj 400 horses stolen from the forests of Tamil Nadu | esakal

शेरखान

२७ जून १६७७ रोजी मराठ्यांच्या तुकडीने पुन्हा शेरखानावर हल्ला केला. त्याचे ३०० घोडे, ४ हत्ती जप्त केले.

How were Chhatrapati Shivaji Maharaj 400 horses stolen from the forests of Tamil Nadu | esakal

शरन

परत सुटलेला शेरखान भुवनगिरी किल्ल्याच्या आश्रयाला गेला. महाराजांनी किल्ल्यावर हल्ला केला अन् शेरखान शरन आला.

How were Chhatrapati Shivaji Maharaj 400 horses stolen from the forests of Tamil Nadu | esakal

अरेलु

शरेखानने तह करत स्वत:चा मुलगा महाराजांकडे ओलीस ठेवला अन् तो अरेलुच्या जंगलात निघून गेला.

How were Chhatrapati Shivaji Maharaj 400 horses stolen from the forests of Tamil Nadu | esakal

तंजावर

त्यानंतर शिवाजी महाराज पुढील मोहीमेवर निघाले. दक्षिण दिशेला तंजावरकडे निघाले. कोल्लीडम नदीच्या काठावर तिरुमझपाडी या गावात महाराजांची छावणी होती.

How were Chhatrapati Shivaji Maharaj 400 horses stolen from the forests of Tamil Nadu | esakal

पाँडिचेरी

यावेळी पाँडिचेरी वसाहतीच्या मुख्य अधिकारी होता फ्रान्सीस मार्टिन, तो प्रत्येक घडामोडींची नोंदी करत होता. हीच डायरी मेमॉयर्स ऑफ फ्रॅकाइस मार्टिन नावाने पुस्तक स्वरुपात प्रसिद्ध आहे.

How were Chhatrapati Shivaji Maharaj 400 horses stolen from the forests of Tamil Nadu | esakal

चोरी

या पुस्तकात चोरीच्या घटनेचा उल्लेख आहे. शिवाजी महाराजांची छावणी अलेरुच्या जंगलापासून फक्त ५००, ६०० पाऊलांवर होते.

How were Chhatrapati Shivaji Maharaj 400 horses stolen from the forests of Tamil Nadu | esakal

शिवराय

प्रत्येक रात्री काही घोडे पडवून नेले जात होते. चोरांच्या नायकाकडे शिवरायांनी तक्रार केली पण त्यांनी चोरी केले नसल्याचे सांगितले.

How were Chhatrapati Shivaji Maharaj 400 horses stolen from the forests of Tamil Nadu | esakal

छावणी

जर्मेन कार्टेल व कॅटलने चोरांना पाहिले होते. एक माणूस हाहात काही हत्यार घेऊन शिवाजी महाराजांच्या छावणीत शिरला होता.  चोर चोरी करुन जंगलात शिरले.

How were Chhatrapati Shivaji Maharaj 400 horses stolen from the forests of Tamil Nadu | esakal

कल्लार

हे चोर अरेलुच्या जंगलातील कल्लार जमातीचे होते. ते गुरे-ढोरे, चोरत होते. पैसे दिले तर छावणीच्या मध्यभागातून देखील घोडे चोरत.

How were Chhatrapati Shivaji Maharaj 400 horses stolen from the forests of Tamil Nadu | esakal

अद्दल

यामागे शेरखान असल्याचे शिवाजी महाराजांना समजले. अरेलुच्या नायकाने शेरखानला आसरा दिला होता. त्यानंतर शिवाजी महाराजांनी त्याला अद्दल शिकवली.

How were Chhatrapati Shivaji Maharaj 400 horses stolen from the forests of Tamil Nadu | esakal

छत्रपती शिवाजी महाराजांनी पत्र लिहलेला पहिला मावळा कोण? आजही आहे दुर्लक्षित...

येथे क्लिक करा