Sandip Kapde
छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपल्याला त्यांच्या जीवनाविषयी जाणून घेण्यात मोठी उत्सुकता असते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देखील थरारक आहे. एक असा किस्सा आहे की तामिळनाडूच्या जंगलात महाराजांचे ४०० घोडे चोरीला गेले होते.
तामिळनाडूच्या घनदाट जंगलात हा प्रकार घडला. ही घटना लिहून ठेवण्यात आली आहे.
महाराष्ट्रापासून १२०० कि.मी. दूरच्या अनोळखी प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांची मोहीम होती
छत्रपती शिवाजी महाराजांची दक्षिण भारत मोहीम डिसेंबर १६७६ ते एप्रिल मे १६७८ तब्बल दिड वर्ष सुरु होती.
सभासद बखर व इंग्लीश रेकॉर्डनुसार शिवाजी महाराजांनी विस हजार घोडदौड व ३० हजार पायदळ सैन्य घेतले होते.
या मोहिमेदरम्यान स्वत: छत्रपती शिवाजी महाराज छावणीत असताना ४०० घोडे चोरीला गेल्याची घटना घडली.
हा प्रकार ज्यांनी पाहिला ते जर्मेन व कॅटेलने याने घोडे कसे चोरीला गेले याचे वर्णन केले. मार्टिनच्या डायरीत हा उल्लेख आहे.
शिवराय आपल्या सैन्यासह तामिळनाडूमध्ये दाखल झाले. तेव्हा दक्षिण भारतातून आदिलशाही सत्तेचे उच्चाटन सुरु झाले.
बंगळुरु, जिंजी, वेल्लोर, सालेम, पाँडीचेरी, अरेलूर, तंजावर या भागात महाराजांची मोहीम होती.
कोल्लीडम भागात मुख्य सुभेदार होता शेरखान लोधी २० मे १६७७ रोजी जिंजीचा किल्ला शिवरायांनी जिंकला.
महाराजांना शेरखानाला भुईसपाट करायचे होते. तिरुवाडीलच्या लढाईत पराभूत होऊन शेरखान पळाला.
मराठ्यांच्या तुकडीने त्याचा पाठलाग करुन २७० घोडे, २० उंट, कित्येक बैल. तंबू, नगारे, जप्त केले.
२७ जून १६७७ रोजी मराठ्यांच्या तुकडीने पुन्हा शेरखानावर हल्ला केला. त्याचे ३०० घोडे, ४ हत्ती जप्त केले.
परत सुटलेला शेरखान भुवनगिरी किल्ल्याच्या आश्रयाला गेला. महाराजांनी किल्ल्यावर हल्ला केला अन् शेरखान शरन आला.
शरेखानने तह करत स्वत:चा मुलगा महाराजांकडे ओलीस ठेवला अन् तो अरेलुच्या जंगलात निघून गेला.
त्यानंतर शिवाजी महाराज पुढील मोहीमेवर निघाले. दक्षिण दिशेला तंजावरकडे निघाले. कोल्लीडम नदीच्या काठावर तिरुमझपाडी या गावात महाराजांची छावणी होती.
यावेळी पाँडिचेरी वसाहतीच्या मुख्य अधिकारी होता फ्रान्सीस मार्टिन, तो प्रत्येक घडामोडींची नोंदी करत होता. हीच डायरी मेमॉयर्स ऑफ फ्रॅकाइस मार्टिन नावाने पुस्तक स्वरुपात प्रसिद्ध आहे.
या पुस्तकात चोरीच्या घटनेचा उल्लेख आहे. शिवाजी महाराजांची छावणी अलेरुच्या जंगलापासून फक्त ५००, ६०० पाऊलांवर होते.
प्रत्येक रात्री काही घोडे पडवून नेले जात होते. चोरांच्या नायकाकडे शिवरायांनी तक्रार केली पण त्यांनी चोरी केले नसल्याचे सांगितले.
जर्मेन कार्टेल व कॅटलने चोरांना पाहिले होते. एक माणूस हाहात काही हत्यार घेऊन शिवाजी महाराजांच्या छावणीत शिरला होता. चोर चोरी करुन जंगलात शिरले.
हे चोर अरेलुच्या जंगलातील कल्लार जमातीचे होते. ते गुरे-ढोरे, चोरत होते. पैसे दिले तर छावणीच्या मध्यभागातून देखील घोडे चोरत.
यामागे शेरखान असल्याचे शिवाजी महाराजांना समजले. अरेलुच्या नायकाने शेरखानला आसरा दिला होता. त्यानंतर शिवाजी महाराजांनी त्याला अद्दल शिकवली.