छत्रपती शिवाजी महाराजांचे ४०० घोडे नेमके कुणी चोरले होते?

Sandip Kapde

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव उच्चारताच त्यांच्या पराक्रमी जीवनाविषयी, कार्याविषयी आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण होते.

How were Chhatrapati Shivaji Maharaj 400 horses stolen from the forests of Tamil Nadu | esakal

इतिहास

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात अनेक थरारक आणि प्रेरणादायी घटना आहेत. त्यापैकी एक रोचक प्रसंग असा सांगितला जातो की, तामिळनाडूच्या जंगलात महाराजांचे तब्बल ४०० घोडे चोरीला गेले होते.

How were Chhatrapati Shivaji Maharaj 400 horses stolen from the forests of Tamil Nadu | esakal

तामिळनाडू

हा प्रकार तामिळनाडूच्या घनदाट जंगलात घडला होता आणि त्याची नोंदही करण्यात आली होती.

How were Chhatrapati Shivaji Maharaj 400 horses stolen from the forests of Tamil Nadu | esakal

महाराष्ट्र

महाराष्ट्रापासून १२०० कि.मी. दूरच्या अनोळखी प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांची मोहीम होती

How were Chhatrapati Shivaji Maharaj 400 horses stolen from the forests of Tamil Nadu | esakal

दक्षिण भारत मोहीम

छत्रपती शिवाजी महाराजांची दक्षिण भारत मोहीम डिसेंबर १६७६ ते एप्रिल मे १६७८ तब्बल दिड वर्ष सुरु होती.

How were Chhatrapati Shivaji Maharaj 400 horses stolen from the forests of Tamil Nadu | esakal

संदर्भ

सभासद बखर आणि इंग्रजी नोंदींनुसार, छत्रपती शिवाजी महाराजांनी या मोहिमेसाठी सुमारे २० हजार घोडदळ आणि ३० हजार पायदळ सैनिकांसह प्रस्थान केले होते.

How were Chhatrapati Shivaji Maharaj 400 horses stolen from the forests of Tamil Nadu | esakal

घोडे

या मोहिमेदरम्यान स्वत: छत्रपती शिवाजी महाराज छावणीत असताना ४०० घोडे चोरीला गेल्याची घटना घडली.

How were Chhatrapati Shivaji Maharaj 400 horses stolen from the forests of Tamil Nadu | esakal

वर्णन

हा प्रकार प्रत्यक्ष पाहणारे जर्मेन आणि कॅटेलने यांनी घोड्यांची चोरी नेमकी कशी झाली, याचे सविस्तर वर्णन केले आहे. याचा उल्लेख मार्टिनच्या डायरीत आढळतो.

How were Chhatrapati Shivaji Maharaj 400 horses stolen from the forests of Tamil Nadu | esakal

शिवराय

शिवराय आपल्या सैन्यासह तामिळनाडूमध्ये दाखल झाले. तेव्हा दक्षिण भारतातून आदिलशाही सत्तेचे उच्चाटन सुरु झाले.

How were Chhatrapati Shivaji Maharaj 400 horses stolen from the forests of Tamil Nadu | esakal

बंगळुरु

बंगळुरु, जिंजी, वेल्लोर, सालेम, पाँडीचेरी, अरेलूर आणि तंजावर या प्रदेशांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी यशस्वी लष्करी मोहिमा राबवल्या.

How were Chhatrapati Shivaji Maharaj 400 horses stolen from the forests of Tamil Nadu | esakal

कोल्लीडम

कोल्लीडम परिसराचा मुख्य सुभेदार शेरखान लोधी होता. त्यानंतर २० मे १६७७ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंजीचा अभेद्य किल्ला जिंकून स्वराज्यात सामील केला.

How were Chhatrapati Shivaji Maharaj 400 horses stolen from the forests of Tamil Nadu | esakal

शेरखान

महाराजांचा उद्देश शेरखानाचा कायमचा बंदोबस्त करण्याचा होता. मात्र तिरुवाडीच्या लढाईत पराभव पत्करल्यानंतर शेरखान रणांगणातून पळ काढण्यात यशस्वी झाला.

How were Chhatrapati Shivaji Maharaj 400 horses stolen from the forests of Tamil Nadu | esakal

घोडे

मराठ्यांच्या तुकडीने त्याचा पाठलाग करून २७० घोडे, २० उंट, अनेक बैल तसेच तंबू, नगारे आणि इतर साहित्य जप्त केले.

How were Chhatrapati Shivaji Maharaj 400 horses stolen from the forests of Tamil Nadu | esakal

शेरखान

२७ जून १६७७ रोजी मराठा सैन्याच्या तुकडीने शेरखानावर पुन्हा जोरदार आक्रमण केले. या कारवाईत त्याचे ३०० घोडे आणि ४ हत्ती मराठ्यांनी जप्त केले.

How were Chhatrapati Shivaji Maharaj 400 horses stolen from the forests of Tamil Nadu | esakal

शरन

पराभवानंतर पळ काढलेल्या शेरखानने भुवनगिरी किल्ल्यात आश्रय घेतला. त्यानंतर महाराजांनी किल्ल्यावर चढाई करत त्याला चारही बाजूंनी घेरले. अखेर शेरखानने शरणागती पत्करली.

How were Chhatrapati Shivaji Maharaj 400 horses stolen from the forests of Tamil Nadu | esakal

अरेलु

शरेखानने तह करत स्वत:चा मुलगा महाराजांकडे ओलीस ठेवला अन् तो अरेलुच्या जंगलात निघून गेला.

How were Chhatrapati Shivaji Maharaj 400 horses stolen from the forests of Tamil Nadu | esakal

तंजावर

त्यानंतर शिवाजी महाराज पुढील मोहीमेवर निघाले. दक्षिण दिशेला तंजावरकडे निघाले. कोल्लीडम नदीच्या काठावर तिरुमझपाडी या गावात महाराजांची छावणी होती.

How were Chhatrapati Shivaji Maharaj 400 horses stolen from the forests of Tamil Nadu | esakal

पाँडिचेरी

पाँडिचेरीचे तत्कालीन प्रमुख अधिकारी फ्राँस्वा (फ्रान्सिस) मार्टिन यांनी सर्व घडामोडींची नोंद केली. त्यांच्या या नोंदी Memoirs of François Martin या पुस्तकात प्रकाशित आहेत.

How were Chhatrapati Shivaji Maharaj 400 horses stolen from the forests of Tamil Nadu | esakal

चोरी

या पुस्तकानुसार, चोरीची घटना अलेरुच्या जंगलात घडल्याचा उल्लेख आहे. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची छावणी या जंगलापासून अवघ्या ५०० ते ६०० पावलांच्या अंतरावर होती.

How were Chhatrapati Shivaji Maharaj 400 horses stolen from the forests of Tamil Nadu | esakal

शिवराय

दररोज रात्री घोडे रहस्यमयरीत्या चोरीला जात होते. याबाबत शिवरायांनी चोरांच्या नायकाकडे तक्रार केली, मात्र त्याने चोरीत आपला कोणताही सहभाग नसल्याचा दावा केला.

How were Chhatrapati Shivaji Maharaj 400 horses stolen from the forests of Tamil Nadu | esakal

छावणी

जर्मेन कार्टेल आणि कॅटल यांनी चोरांना पाहिले होते. एक व्यक्ती हत्यारासह छावणीत शिरला आणि चोरी करून जंगलात पसार झाला.

How were Chhatrapati Shivaji Maharaj 400 horses stolen from the forests of Tamil Nadu | esakal

कल्लार

जहे चोर अरेलुच्या जंगलात राहणाऱ्या कल्लार जमातीतील होते. गुरे-ढोरे चोरी करणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. इतकेच नव्हे, तर मोठी रक्कम मिळाल्यास ते लष्करी छावणीच्या मध्यभागातूनही घोडे चोरून नेत असत.

How were Chhatrapati Shivaji Maharaj 400 horses stolen from the forests of Tamil Nadu | esakal

अद्दल

शिवाजी महाराजांना या कटामागे शेरखान असल्याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने पावले उचलली. अरेलुच्या नायकाने शेरखानला आश्रय दिल्याचे समोर आल्यानंतर महाराजांनी त्याच्यावर कारवाई करत त्याला चांगलीच अद्दल घडवली.

How were Chhatrapati Shivaji Maharaj 400 horses stolen from the forests of Tamil Nadu | esakal

छत्रपती शिवाजी महाराजांनी पत्र लिहलेला पहिला मावळा कोण? आजही आहे दुर्लक्षित...

येथे क्लिक करा