संतोष कानडे
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आपलं नाव हे अक्षर, राशी आणि नक्षत्राशी जोडलेलं असतं.
प्रत्येक अक्षराला स्वतंत्र कंपनं असतात. त्यामुळे आत्मविश्वास वाढून निर्णय क्षमता सुधारते.
मानसशास्त्राच्या संशोधनानुसार, नावांचा परिणाम हा व्यक्तिमत्वावर होतो. सोपं आणि पॉझिटिव्ह नाव असेल तर फायदा होतो.
न्यूमरॉलॉजी हे एक वेगळं तंत्र आहे. नावातील प्रत्येक अक्षराला अंक असतो. त्या अंकांची बेरीज करुन लाईफ पाथ नंबर काढला जातो.
या नंबरवरुन करिअर, नातेसंबंध, आर्थिक स्थिती यावर परिणाम करतो, असं सांगितलं जातं.
विज्ञान सांगतं की, तुमचं नाव थेट तुमचं भविष्य ठरवत नाही. नावामुळे वागणं, लोकांचा प्रतिसाद, संधीची शक्यता बदलू शकते.
म्हणजे तुमचं नाव तुमचं भविष्य ठरवतं की नाही, हे खात्रीशीर सांगता येणार नाही. मात्र तुमच्या भविष्यावर परिणाम नक्कीच करु शकतं.
विचारसरणी बदलली, कष्ट घेतले आणि संधी शोधली तर आयुष्यात मोठे बदल होतात. केवळ नाव बदलून चमत्कार होत नाही.