वर्षात फक्त २ वेळाच येते ट्रेन, भारतात कुठे आहे अनोखे रेल्वे स्टेशन ?

Yashwant Kshirsagar

रेल्वे गाड्या

भारतात अशी काही रेल्वे स्टेशन्स आहेत जिथे दररोज शेकडो गाड्या रेल्वेगाड्या ये जा करत असतात.

India's Last Railway Station

|

esakal

अनोखे स्टेशन

मात्र भारतात असे एक अनोखे रेल्वे स्टेशन आहे, जिथे संपूर्ण वर्षात केवळ दोनदाच रेल्वे येते. एका व्हायरल व्हिडिओमुळे हे अद्वितीय स्थानक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे.

India's Last Railway Station

|

esakal

हुसैनीवाला रेल्वे स्टेशन

हे स्टेशन म्हणजे 'हुसैनीवाला रेल्वे स्टेशन' होय, जे पंजाबमधील फिरोजपूर आणि हुसैनीवाला सीमेच्या दरम्यान स्थित आहे.

India's Last Railway Station

|

esakal

शेवटचे स्टेशन

हे स्टेशन या रेल्वे मार्गाचे शेवटचे स्टेशन म्हणून कार्य करते; याच्या पुढे कोणतीही गाडी जात नाही.

India's Last Railway Station

|

esakal

वैशिष्ट्य

या स्थानकाचे सर्वात वैशिष्ट्य म्हणजे वर्षातून केवळ दोनदाच येथे गाडी येते, पहिल्यांदा २३ मार्च रोजी आणि दुसऱ्यांदा १३ एप्रिल रोजी बैसाखीच्या दिवशी येते

India's Last Railway Station

|

esakal

वर्षभर ओस

बाकी संपूर्ण वर्षभर हे स्टेशन जवळजवळ ओस पडलेले असते.

India's Last Railway Station

|

esakal

हुतात्मा दिन

२३ मार्च हा दिवस भगतसिंग यांचा 'हुतात्मा दिन' म्हणून पाळला जातो. या दिवशी, देशभरातून लोक हुसैनीवाला सीमेवर एकत्र जमतात आणि त्यांना आपली आदरांजली अर्पण करतात.

India's Last Railway Station

|

esakal

विशेष प्रसंग

नेमक्या याच कारणामुळे या विशेष प्रसंगी एक विशेष गाडी चालवली जाते.

India's Last Railway Station

|

esakal

महाराष्ट्रातील 'या' गावात आहे दुर्योधनाचे एकमेव मंदिर, दर्शनाला होते भाविकांची गर्दी

Duryodhana Temple Durgav

|

esakal

येथे क्लिक करा