Monika Shinde
पुरेशी झोप मेंदूतील तणावग्रस्त हार्मोन्सचं प्रमाण नियंत्रित ठेवते. यामुळे मन शांत राहतं आणि चिंता कमी होते.
झोप पूर्ण झाली तर राग, चिडचिड आणि नैराश्य दूर राहतं. मन अधिक स्थिर आणि सकारात्मक होतं.
दिवसभरात जे काही शिकलो आहे. त्याची माहिती मेंदूत नीट साठवण्यासाठी झोप अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे अभ्यास करणाऱ्यांसाठी झोप ‘ब्रेन बूस्टर’सारखी!
निद्रानाश झाल्यास निर्णय घेताना गोंधळ होतो. चांगली झोप विचारांची स्पष्टता देते.
पुरेशी झोप झाल्यावर दिवसभर फ्रेश वाटतं. थकवा जाणवत नाही आणि कामात उत्साह राहतो.
झोपेमुळे वाढीचे, भूक नियंत्रित करणारे आणि स्ट्रेस हार्मोन्स योग्य प्रमाणात काम करतात.
योग्य झोपेमुळे रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित राहतो. त्यामुळे हृदय विकारांचा धोका कमी होतो.