President Murmu : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येस राष्ट्रपती मुर्मू यांनी देशाला केलेल्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे!

Mayur Ratnaparkhe

देशाला संबोधन -

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी देशवासियांना संबोधित केलं.

सरकारच्या कामांचे कौतुक -

यावेळी ऑपरेशन सिंदूर आणि भारत सरकारच्या कामांचे कौतुक केलं.

भारतीयांसाठी गर्वाचे प्रतीक -

१५ ऑगस्ट हा केवळ स्वातंत्र्य पर्व नाहीये तर प्रत्येक भारतीयासाठी गर्वाचे प्रतीक आहे.

संविधान आणि लोकशाही सर्वोच्च -

संविधान आणि लोकशाही हे आमच्यासाठी सर्वोच्च आहे. या दोन्ही गोष्टी आमच्या ताकद सुद्धा आहेत, असं राष्ट्रपती म्हणाल्या.

ऑपरेशन सिंदूरची नोंद -

दहशतवादाविरुद्ध मानवतेच्या लढाईचे उदाहरण म्हणून इतिहासात ऑपरेशन सिंदूरची नोंद केली जाईल.

ऑपरेशन सिंदूर -

ऑपरेशन सिंदूर हे पहलगाम हल्ल्याचं चोख प्रत्युत्तर होते. या ऑपरेशनमुळे भारतीय लष्कर देशाचं संरक्षण करण्यास सक्षम असल्याचं सिद्ध झालं.

देशांतर्गत मागणीत वाढ -

२०४७ पर्यंत विकसित राष्ट्रजागतिक अर्थव्यवस्थेतील तणाव असूनही, देशांतर्गत मागणी वेगाने वाढत आहे.

२०४७ पर्यंत विकसित राष्ट्र -

सामाजिक क्षेत्रात केल्या गेलेल्या उपाययोजनांसह सर्वांगीण आर्थिक विकासामुळे, भारत २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र होण्याच्या मार्गावर आहे.

draupadi murmu and smriti irani | esakal

Next : विमानाला मायलेज किती असतं, कोणतं इंधिन वापरलं जात?

येथे पाहा