स्वातंत्र्यदिन साजरा करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

Monika Shinde

भारताचा स्वातंत्र्यदिन

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य मिळालं. हा दिवस आपल्या देशाच्या स्वातंत्र्य संघर्षाचा विजय दिवस आहे.

Independence Day of India | Esakal

देशभक्तांना करा नमन

भगतसिंग, नेहरू, गांधीजी, सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या क्रांतिकारकांना वंदन करा. त्यांच्यामुळेच आपण आज स्वातंत्र्याचा श्वास घेत आहोत.

Salute to the patriots. | Esakal

राष्ट्रध्वजाचा सन्मान ठेवा

तिरंग्याचा आदर राखा. योग्य पद्धतीने ध्वजारोहण करा आणि राष्ट्रगीत म्हणताना उभं राहून आदर दाखवा.

Respect the national flag. | Esakal

सोशल मीडियावर जबाबदारीने पोस्ट करा

देशभक्तीच्या भावना सोशल मीडियावर व्यक्त करताना अचूक माहिती आणि आदर राखून वागा. चुकीच्या गोष्टी पसरवू नका.

Post responsibly on social media. | Esakal

झेंडा किंवा ब्रोच

तिरंग्याचा अपमान होईल अशा ठिकाणी तो ठेवू नका जसे की रस्त्यावर, जमिनीवर किंवा कोपऱ्यात.

Flag or brooch | Esakal

स्थानिक शूरवीरांची आठवण ठेवा

आपल्या गावातील, राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाची माहिती घ्या आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा.

Remember the local heroes | Esakal

पर्यावरणपूरक उत्सव साजरा करा

स्वातंत्र्यदिन साजरा करताना फटाके न वापरता पर्यावरणपूरक आणि शांततेत साजरा करा. हरित क्रांती हाच पुढचा टप्पा.

Celebrate an eco-friendly festival | Esakal

भारतीय बनावटीचे वस्त्र परिधान करा

या दिवशी खादी किंवा भारतीय वस्त्र परिधान करून स्वदेशीला प्रोत्साहन द्या. ‘वोकल फॉर लोकल’ या विचाराला साथ द्या.

Wear Indian-made clothes. | Esakal

एक चांगला नागरिक बना

स्वातंत्र्य ही केवळ साजरी करण्याची गोष्ट नाही. ती जबाबदारीही आहे. कायद्याचं पालन करा आणि देशहितासाठी नेहमी तयार रहा.

Be a good citizen | Esakal

एकाग्रतेपासून दृष्टीपर्यंत लाभदायक! ‘त्राटक क्रिया’चे आश्चर्यकारक फायदे

येथे क्लिक करा