देशातील 'या' शहरात १६ ऑगस्टला साजरा केला जातो स्वातंत्र्यदिन, काय आहे कारण?

Yashwant Kshirsagar

डुमरांवमध्ये १६ ऑगस्ट

भारतात दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा होतो. मात्र बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील डुमरांव येथे हा दिवस १६ ऑगस्ट रोजी देखील तितक्याच उत्साहाने साजरा केला जातो.

Dumraon Independence Day

|

esakal

१९४२ च्या बलिदानाची आठवण

ही परंपरा १९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनादरम्यान देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या चार शूर स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाशी निगडीत आहे.

Dumraon Independence Day

|

esakal

गांधीजींची ‘करा किंवा मरा’ हाक

महात्मा गांधींनी दिलेल्या ‘करा किंवा मरा’ या हाकेने देशभर आंदोलन तीव्र झाले. डुमरांवमधील हजारो लोकांनी तिरंगा घेऊन पोलीस ठाण्याकडे कूच केली.

Dumraon Independence Day

|

esakal

पोलीस ठाण्यावर राष्ट्रध्वज

ब्रिटिश प्रशासनाच्या ताब्यात असलेल्या इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवून स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणे हा आंदोलकांचा उद्देश होता. महिला, तरुण आणि मुलांनीही यात सक्रिय सहभाग घेतला.

Dumraon Independence Day

|

esakal

गोळीबारात चार हुतात्मे

आंदोलक माघार घेण्यास तयार नसल्याने ब्रिटिश पोलिसांनी गोळीबार केला. यात कपिल मुनी, गोपाल कहार, रामदास सोनार आणि रामदास लोहार हे हुतात्मा झाले.

Dumraon Independence Day

|

esakal

बलिदानानंतरही तिरंगा फडकवला

अनेक जण जखमी झाले तरी लोकांचा निर्धार डगमगला नाही. सहकाऱ्यांचे बलिदान होऊनही आंदोलन सुरू राहिले आणि अखेरीस तिरंगा फडकवून संकल्प पूर्ण झाला.

Dumraon Independence Day

|

esakal

पोलीस ठाणे झाले स्मारक

स्वातंत्र्यानंतर ज्या पोलीस ठाण्यावर ही घटना घडली, त्याचे रूपांतर चार हुतात्म्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मारकात करण्यात आले. आजही हे स्मारक त्या बलिदानाची आठवण करून देते.

Dumraon Independence Day

|

esakal

दरवर्षी १६ ऑगस्टला श्रद्धांजली

दरवर्षी १६ ऑगस्ट रोजी येथे मोठ्या संख्येने लोक जमून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहतात, राष्ट्रध्वज फडकवतात आणि त्यांच्या योगदानाचा गौरव करतात.

Dumraon Independence Day

|

esakal

२०१५ मध्ये अधिकृत मान्यता

कालांतराने या परंपरेला अधिकृत मान्यता मिळाली. २०१५ मध्ये बिहार सरकारने १६ ऑगस्ट रोजीच्या कार्यक्रमास अधिकृत दर्जा दिला.

Dumraon Independence Day

|

esakal

२०१७ मध्ये पुतळ्यांचे अनावरण

२०१७ मध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हुतात्मा स्मारकापाशी त्या चार वीरांच्या पुतळ्यांचे अनावरण केले, जेणेकरून भावी पिढ्याही त्यांच्या बलिदानाची आठवण ठेवतील.

Dumraon Independence Day

|

esakal

दररोज काळ्या तांदळाचा भात खाल्ल्यास शरीराला मिळतात ‘हे’ १२ आश्चर्यकारक फायदे!

Black Rice Health Benefits

|

esakal

येथे क्लिक करा