Pranali Kodre
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत २३ फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान संघ आमने-सामने येणार आहेत.
हा सामना दुबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहे.
भारत आणि पाकिस्तान संघ जेव्हाही आमने-सामने असतात, तेव्हा चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येते.
या दोन संघात आत्तापर्यंत वनडेमध्ये १३५ सामने झाले आहेत, त्यामध्ये भारताने ५७ सामन्यांत विजय मिळवला आहे, तर पाकिस्तानने ७३ सामने जिंकले आहेत. ५ सामने अनिर्णित राहिलेत.
दोन संघातील एकूण आमने-सामने आकडेवारीमध्ये पाकिस्तान वरचढ दिसत असले तरी गेल्या १० वर्षात भारताचे वर्चस्व राहिल्याचे दिसले आहे.
गेल्या १० वर्षात म्हणजेच २०१५पासून या दोन संघात ९ वनडे सामने झाले असून ७ सामने भारताने जिंकले आहेत, तर १ सामने पाकिस्तानने जिंकला आहे. १ सामना अनिर्णित राहिला आहे.
तसेच भारत आणि पाकिस्तान संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आत्तापर्यंत ५ सामने झाले असून २ सामने भारताने जिंकलेत, तर ३ सामने पाकिस्तानने जिंकले आहेत.
दुबईमध्ये झालेल्या दोन वनडे सामन्यात भारतानेच पाकिस्तानवर विजय मिळवला आहे.