Saisimran Ghashi
काही वर्षांपूर्वी ‘गाझी अटॅक’ हा चित्रपट चर्चेत आला होता. पण ही कथा फक्त चित्रपटापुरती मर्यादित नव्हती. हे खरे मिशन भारतीय नौदलाच्या इतिहासातील गौरवशाली पान आहे.
भारत-पाकिस्तान युद्ध सुरू होण्याआधीच पाकिस्तानने भारताच्या आयएनएस विक्रांतला नेस्तनाबूत करण्याचा कट आखला होता. त्यासाठी त्यांनी अत्याधुनिक 'गाझी' पाणबुडी पाठवली.
गाझीचं मूळ नाव होतं युएसएस डिआबलो. ती अमेरिकेकडून विकत घेतलेली जुनी पण शक्तिशाली पाणबुडी होती. रडार चुकवून लांबवर जाऊ शकणारी ती पाणबुडी भारताच्या सीमेत आली.
व्हाईस अॅडमिरल एन कृष्णन यांनी गाझीचा मुकाबला करण्याची योजना आखली. गाझीच्या हालचालींवर नजर ठेवत विक्रांतला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं.
भारतीय नौदलाने खोटे सिग्नल पाठवत गाझीला भ्रमात ठेवले. विक्रांतच्या जागी दुसऱ्या महायुद्धातील आयएनएस राजपुतला पुढे आणले.
गाझी राजपुतच्या दिशेने सरकू लागली. राजपुतवरून जाणीवपूर्वक सिग्नल पाठवले जात होते, ज्यामुळे गाझीने त्याला विक्रांत समजले.
३ डिसेंबरच्या मध्यरात्री, राजपुतच्या सोनारवर गाझी सापडली. कॅप्टन इंदर कुमार यांनी दोन मिसाईल्स डागण्याचे आदेश दिले.
मिसाईल्सच्या स्फोटानंतर गाझी नष्ट झाली. सकाळी मच्छिमारांना समुद्रात तेल आणि अवशेष आढळले. भारतीय नौदलाने विजय मिळवला होता.
गाझी नक्की कशी बुडाली यावर दोन मतं आहेत मिसाईलमुळे किंवा गाझी स्वतःच टाकलेल्या सागरी माईन्समध्ये अडकल्यामुळे.
गाझीला नेस्तनाबूत करणारे नौदल अधिकारी व जवान हे खरे नायक. त्यांच्या शौर्यामुळे भारताच्या समुद्रसीमा अधिक सुरक्षित झाल्या.