स्वातंत्र्यानंतरचा ऐतिहासिक टप्पा! भारताची पहिली निवडणूक कधी झाली होती? पाहा फोटो

Aarti Badade

जगातील सर्वात मोठी लोकशाही

जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा देश म्हणून भारताची ओळख आहे. १९४७ मध्ये स्वतंत्र झाल्यानंतर लोकशाही व्यवस्था स्वीकारली गेली आणि निवडणुका होणार होत्या.

Indian Election History

|

Sakal

पहिली निवडणूक कधी?

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात पहिली सार्वत्रिक निवडणूक १९५२ साली झाली. या निवडणुकीकडे भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते.

Indian Election History

|

Sakal

निवडणूक आयोगाची स्थापना

मार्च १९५० साली देशात पहिला निवडणूक आयोग नेमण्यात आला. सुकुमार सेन हे देशाचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते.

Indian Election History

|

Sakal

चार महिन्यांची प्रक्रिया

सुकुमार सेन यांच्या नेतृत्वाखालील ही पहिली निवडणूक प्रक्रिया तब्बल चार महिने चालली. २५ ऑक्टोबर १९५१ रोजी सुरू होऊन ती फेब्रुवारी १९५२ पर्यंत पार पडली.

Indian Election History

|

Sakal

मतदार आणि जागा

या पहिल्या निवडणुकीत लोकसभेच्या ४९९ जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकीत जवळपास १७ कोटी नागरिकांनी सहभाग घेतला, ज्यात ४५.७ टक्के मतदान झाले.

Indian Election History

|

Sakal

काँग्रेसचा ऐतिहासिक विजय

पहिल्या निवडणुकीच्या निकालात काँग्रेस पक्षाने ऐतिहासिक आघाडी घेतली. ४५ टक्के मतं मिळवत काँग्रेसने ३६४ जागांवर दणदणीत विजय मिळवला.

Indian Election History

|

Sakal

इतर पक्षांचे स्थान

या निवडणुकीत कम्युनिस्ट पक्षाने १६ जागा जिंकल्या (ज्यात मद्रासमधील ८ जागा होत्या). तर भारतीय जनसंघाने ४९ जागांवर उमेदवार उभे करून केवळ ३ जागा जिंकल्या होत्या.

Indian Election History

|

Sakal

ताजमहलचा 466 किलो सोन्याचा कळस कुठे गेला?

Taj Mahal Gold kalash

|

Sakal

येथे क्लिक करा