सकाळ वृत्तसेवा
औरंगजेबाच्या काळात मंदिरे तोडण्याचा आदेश निघाला. तेव्हा मराठ्यांमुळेच जगन्नाथ मंदिराचा इतिहास टिकून राहिला.
येथे कृष्ण, बलराम आणि सुभद्राच्या लाकडी मूर्ती आहेत. दर १२ वर्षांनी नवीन मूर्ती बनवल्या जातात.
मंदिर तोडण्याचा आदेश होता. तरीही पुजाऱ्यांनी लाच देऊन मंदिर वाचवले. औरंगजेब मराठ्यांशी युद्धात गुंतल्याने मंदिरावर तात्पुरते टाळे लागले.
मराठ्यांनी स्थिरता मिळवली आणि देशभर आपले वर्चस्व निर्माण केले. रघुजी भोसले यांचे साम्राज्य बंगाल ते ओरिसापर्यंत विस्तारले.
दहा वर्षे मराठ्यांनी बंगाल व ओरिसावर हल्ले केले. शेवटी, नवाबाने ओरिसा प्रांत मराठ्यांच्या ताब्यात दिला.
रघुजी भोसले आणि त्यांच्या आई चिमाबाई यांनी जगन्नाथ मंदिराला खूप दान दिले. त्यांनी पूजेसाठी जमीन दिली आणि 'मोहनभोग' ही परंपरा सुरू केली.
रघुजी भोसले यांनी रथयात्रा आणखी भव्य केली. त्यांनी त्यासाठी मोठा निधी दिला. यात्रेतील ‘झुलना यात्रा’ मराठ्यांनीच सुरू केल्याचे मानले जाते.
मराठ्यांनी रस्ते, धर्मशाळा आणि विहिरी बांधल्या. त्यांनी यात्रेकरूंसाठी सोयीसुविधा, करसुधारणा आणि शेतीच्या विकासावर भर दिला.
जमिनीची नोंदणी, सैनिकांची ठाणी, मठ व्यवस्था – आजही ओरिसात मराठ्यांचे अस्तित्व जाणवते.