जांभूळ आख्यान माहितीय का? वाचा महाभारतातली अख्यायिका

सकाळ डिजिटल टीम

जांभूळ आख्यान

महाभारतात "जांभूळ आख्यान" म्हणून एक अख्यायिका सांगितली जाते. सत्य आणि प्रामाणिकपणाचं महत्व म्हणून या कथेकडं पाहिलं जातं

Jambhul

|

Esakal

पांडवांचा वनवास

वनवासात असताना द्रौपदी, श्रीकृष्ण आणि पांडव जंगलात फिरत होते. त्यावेळी द्रौपदीने झाडारचं एक मोठं टपोरं जांभूळ तोडलं.

Jambhul

|

Esakal

ऋषीचा कोप

तपस्वी ऋषींच्या तपश्चर्येचं फळ म्हणून ते जांभूळ राखून ठेवलं होतं. आता ते तोडल्यामुळे ऋषीचा कोप होऊन सर्वांना शाप लागेल अशी भीती वाटू लागली.

Jambhul

|

Esakal

श्रीकृष्णांचा उपाय

पांडवांवर ओढावलेल्या या संकटात श्रीकृष्ण धावून आले. त्यांनी यावर उपायही सांगितला. प्रत्येकानं मनातल्या इच्छा आणि सत्य सांगितल्यास हे तुटलेलं जांभूळ त्याच्या जागी चिकटेल असं कृष्ण म्हणाले.

Jambhul

|

Esakal

पांडवांचे सत्यकथन

श्रीकृष्णाने उपाय सांगताच युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव यांनी त्यांच्या मनातल्या इच्छा सांगितल्या. त्यांनी सत्य बोलून दाखवलं.

Jambhul

|

Esakal

जांभूळ वर सरकलं

पांडवांनी सत्यकथन करताच जांभूळ वर सरकलं पण झाडाला चिकटलं नाही. श्रीकृष्णांनी द्रौपदीला सत्य बोलण्यास सांगितलं.

Jambhul

|

Esakal

द्रौपदी

द्रौपदीनं तिच्या मनात कर्णाबद्दल निर्माण झालेल्या भावना व्यक्त केल्या. तिच्या या प्रामाणिक कबुलीनंतर चमत्कार घडला आणि जांभूळ त्याच्या जागी चिकटले.

Jambhul

|

Esakal

अख्यायिका

महर्षी व्यास यांनी लिहिलेल्या महाभारतात जांभूळ आख्यान नाही. मात्र महाभारतातली ही अख्यायिका प्रामाणिकपणाचं महत्त्व म्हणून सांगितली जाते.

Jambhul

|

Esakal

जगभरात लोक दारूपासून दूर, पण भारतात वाढतोय मद्य व्यवसाय, जाणून घ्या कारण

alchohol

| esakal
इथं क्लिक करा