जन्माष्टमीला उपवास का करतात?

सकाळ डिजिटल टीम

उपवास

जन्माष्टमीला उपवास का करतात? किंवा या दिवशी उपवास का कारवा या मागची काय कारणं आहेत जाणून घ्या.

Janmashtami Fast | sakal

श्रद्धेचे प्रतीक

उपवास हे भगवान श्रीकृष्णावरील भक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक मानले जाते. भक्त या दिवशी स्वतःला पूर्णपणे देवाच्या चरणी समर्पित करतात.

Janmashtami Fast | sakal

पापांचे निवारण

धार्मिक मान्यतेनुसार, जन्माष्टमीचा उपवास केल्याने कळत-नकळत घडलेल्या पापांचे निवारण होते.

Janmashtami Fast | sakal

सुख-समृद्धी

असे मानले जाते की, जो भक्त पूर्ण निष्ठेने हा उपवास करतो, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्याला सुख-समृद्धी मिळते.

Janmashtami Fast | sakal

बाळकृष्ण

श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला होता. त्यामुळे भक्त दिवसभर उपवास करून मध्यरात्री १२ वाजता पूजा व आरती करून उपवास सोडतात. हा उपवास बाळकृष्णाच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी केला जातो.

Janmashtami Fast | sakal

शरीर शुद्धी

वैज्ञानिक दृष्टिकोनातून, उपवास केल्याने शरीराला विश्रांती मिळते. यामुळे पचनसंस्था शुद्ध होते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.

Janmashtami Fast | sakal

मानसिक शांती

उपवास केल्याने मन शांत होते आणि ध्यान केंद्रित करण्यास मदत होते. यामुळे मानसिक आरोग्य सुधारण्यासही मदत होते.

Janmashtami Fast | sakal

पुनर्जन्म

काही लोकांच्या मते, हा उपवास जीवनातील पुनर्जन्म आणि नवीन सुरुवात दर्शवतो, जसे श्रीकृष्ण पुन्हा जन्माला आले.

Janmashtami Fast | sakal

सकारात्मक ऊर्जा

उपवास केल्याने घरात आणि मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. यामुळे कुटुंबात आनंद आणि शांती टिकून राहते.

Janmashtami Fast | sakal

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ध्वज वेगळ्या पद्धतीने का फडकवला जातो? कारण जाणून थक्क व्हाल!

Independence Day Flag | esakal
येथे क्लिक करा