सकाळ डिजिटल टीम
अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे तब्बल ९ महिन्यांनी पृथ्वीवर परतणार आहेत. त्यांच्या परतण्याची प्रतिक्षा जगभरात केली जात आहे.
भारतीय वंशाची असलेल्या सुनीता विल्यम्सच्या परतण्याकडे भारतीयांचंही लक्ष लागलं आहे.
सुनिता विल्यम्सप्रमाणे आणखी एका भारतीय महिलेनं अंतराळ विश्वात नाव कमावलं. कल्पना चावलाने अंतराळ विश्वात देशाची मान उंचावली.
कल्पना चावलाचा जन्म हरियाणात झाला होता. अंतराळ मोहिमेवेळी तिचा दुर्घटनेत मृत्यू झाला होता.
तिच्या दुसऱ्या अंतराळ मोहिमेला गेलेल्या कल्पना चावलाचा दुर्घटनेत मृत्यू झाला. कल्पना चावला पुन्हा परतणार की नाही हे कुणालाही खात्रीशीर माहिती नव्हतं.
१ फेब्रुवारी २००३ रोजी नासाचं अंतराळ यान ७ जणांसह पृथ्वीवर परत येत होतं.
पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच यानाचं शटल क्रॅश झालं. या दुर्घटनेत सर्व अंतराळवीरांचा मृत्यू झाला.
यानाच्या विंगमध्ये झालेल्या छिद्राने बाहेरचा वायू अंतराळयानात वेगाने भरला. यामुळे सेन्सर खराब होऊन शेवटी कोलंबिया शटलचा स्फोट झाला.
नासाने दिलेल्या माहितीनुसार, लँडिंगच्या १६ मिनिटं आधी ही दुर्घटना घडली. पृथ्वीवर परतण्याच्या काही क्षण आधी स्पेस क्राफ्ट क्रॅश झालं.
सुनिता विल्यम्सच्या कुटुंबात कोण कोण?