रोहित कणसे
अनेक वेळा सरकारी कर्मचारी बेकायदेशीर काम करताना किंवा नियमांचे उल्लंघन करताना सापडतात, अशा परिस्थितीत त्यांना एकतर निलंबित किंवा बडतर्फ केले जाते.
आम्ही सहसा निलंबनाच्या बातम्या ऐकत असतो , मग ते निलंबित केल्यावर काय होते हे तुम्हाला माहीत आहे का ?
जेव्हा एखाद्याला निलंबित केले जाते तेव्हा तो त्याची नोकरी गमावतो का ? याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
अनेक वेळा सरकारी कर्मचारी ड्युटीवर नसतात, तर काही वेळा ड्युटीवर असताना ते नियमबाह्य काम करतात त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाच्या (Suspend) बातम्या ऐकायला मिळतात.
जेव्हा एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला त्याच्या विभागाकडून किंवा वरिष्ठ पदावर असलेल्या अधिकाऱ्याकडून निलंबित केले जाते, तेव्हा त्याला त्याच्या संबंधित कामातून तत्काळ कार्यमुक्त केले जाते,
निलंबित केल्यानंतर सराकरी अधिकाऱ्याला कोणतेही कामा करण्याची परवानगी नसते.
विविध विभागांनी कोणत्याही कर्मचाऱ्याला किती दिवस निलंबित केले जाऊ शकते याची कालमर्यादा देखील निश्चित केली आहे . कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला दीर्घकाळ निलंबित ठेवले जात नाही .
ठरलेल्या कालावधीत आधिकाऱ्यावरील आरोपांची चौकशी केली जाते, ज्यामध्ये आरोप खोटे किंवा माफी देण्यासारखे आढळल्यास, नंतर त्याला पुन्हा त्याच पदावर बहाल केले जाते
निलंबनाच्या काळात त्या सरकारी कर्मचाऱ्याला त्याच्या मूळ पगाराच्या निम्मा पगार मिळतो . पदावर पुन्हा घेतल्यानंतर त्याला त्याचा पूर्ण पगार मिळू लागतो.
संसर्गजन्य आजारावर प्रतिकारशक्तीने करता येते मात