रोहित कणसे
सध्या देशातील नियमित आणि अग्निवीर सैनिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा मुद्दा चांगलाच गाजतोय.
यादरम्यान आपल्या देशात कोणत्या दलाच्या जवानांना शहीदाचा दर्जा दिला जातो हे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
देशाच्या सुरक्षेसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व सैनिकांना शहीद म्हटले जातं, पण प्रत्यक्षात सामान्य भाषेत स्वत:ला शहीद म्हणणे आणि कागदपत्रांमध्ये स्वत:ला शहीद म्हणणे यात मोठा फरक आहे.
भारत सरकारकडून ज्या सैनिकांना शहीदांचा दर्जा दिला जातो त्यांना अनेक प्रकारच्या सुविधाही दिल्या जातात.
शहीद पत्नीला आयुष्यभराच्या पगाराच्या बरोबरीचे पेन्शन, विमान अन् रेल्वे भाड्यात सूट, आरोग्याशी संबंधित सुविधा आणि मृत्यूनंतर काही मदत यांचा समावेश आहे.
अग्निवीर जवान कोणत्याही ऑपरेशनमध्ये, लष्करी अपघातात किंवा दहशतवादी हल्ल्यात शहीद झाल्यास त्याला शहीदचा दर्जा मिळत नाही.
कोणत्याही राज्यातील पोलीस कर्मचाऱ्याला दहशतवादी कृत्य किंवा अन्य कोणत्याही कारवाईत आपला जीव गमवावा लागला तर त्यालाही शहीदचा दर्जा मिळत नाही.
निमलष्करी दलाच्या जवानाचा कोणत्याही दहशतवादी घटनेत, ऑपरेशनमध्ये किंवा इतर कोणत्याही कारवायांमध्ये मृत्यू झाल्यास त्यालाही शहीदचा दर्जा मिळत नाही.
देशात कोणत्याही दलातील जवानाच्या मृत्यूनंतर त्याला सामान्य भाषेत शहीद म्हटले जाते. पण प्रत्यक्षात शहीदाचा दर्जा मिळवणाऱ्या लष्करातील जवानांना इतरही अनेक सुविधा दिल्या जातात.
आपल्या देशात केवळ लष्कराच्या जवानांनाच शहीदचा दर्जा मिळतो.
मजेशीर पोस्ट शेअर करत गौरी कुलकर्णीने अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्याबद्दल केलं भाष्य